AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनुभाऊ, कृपा करून एवढं मनावर घ्या… आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही!

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या मतदारसंघात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच त्यांना बीडमध्ये धनुभाऊ या नावाने हाक मारतात. (Minister Dhananjay Munde attend janata Darbar in beed)

धनुभाऊ, कृपा करून एवढं मनावर घ्या... आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही!
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
| Updated on: Feb 05, 2021 | 5:32 PM
Share

बीड: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या मतदारसंघात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच त्यांना बीडमध्ये धनुभाऊ या नावाने हाक मारतात. धनुभाऊचा बीड दौरा हा इथल्या लोकांसाठी एक पर्वणीच असते. धनुभाऊ आले म्हणजे आपली रखडलेली कामं हमखास मार्गी लागणार, आपल्या समस्या सुटणार हे ठरलेलंच असतं. त्यामुळेच त्यांच्या जनता दरबारला मोठी गर्दी होते. आजही अनेक ग्रामस्थांनी मुंडे यांच्या जनता दरबारात हजेरी लावून त्यांच्याकडे समस्या मांडल्या. धनुभाऊ कृपा करून एवढं मनावर घ्या, आम्ही तुमचे उपकार विसणार नाही, अशी विनंतीही केली. (Minister Dhananjay Munde attend janata Darbar in beed)

50 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती नाही

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी जिल्ह्यात जनता दरबार आयोजित करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. बीड जिल्ह्यात रस्त्यांची प्रचंड समस्या आहे. त्यावरच नागरिकांनी आजच्या जनता दरबारमध्ये भर दिला. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोरडेवाडी ते टोकेवाडी हा रस्ता तब्बल 50 वर्षांपासून दुरुस्त झालेला नाही. या रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून अनेक जणांचे अपघात झाले आहेत. या रस्त्यावर वाहन चालविणे मुश्किल झाल्याने रुग्णाची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र रस्ता काम अद्याप सुरू नाही त्यामुळे या गावातील नागरिकांनी मुंडे यांना निवेदन दिले.

कोरडेवाडी ग्रामस्थांची विनवणी

काही ग्रामस्थांनी तर हा रस्ता व्हावा म्हणून मुंडे यांना विनवणी केली. धनुभाऊ कृपा करून एवढं मनावर घ्या… आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही… अशी विनवणी कोरडेवाडी गावातील नागरिकांनी केली. त्यामुळे हा प्रश्न मुंडे सोडविणार की असाच तो वर्षनुवर्षं कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

मुंडे यांच्या जनता दरबारात आज प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना उभं राहण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले होते. अनेकजण सकाळपासून समस्या मांडण्यासाठी आले होते. मात्र, आधीपासूनच जनता दरबारात गर्दी झाल्याने त्यांना या गर्दीत तिष्ठत राहावे लागले. या जनता दरबारात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना मुंडेंना भेटता आले नाही. लोकांनी दिलेले निवेदन मुंडे यांनी स्वीकारले. मात्र अनेक दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात परवड झाल्याचं पाहायला मिळाले. (Minister Dhananjay Munde attend janata Darbar in beed)

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde Uncut : पंकजांसमोर धनंजय म्हणाले, बीडची जबाबदारी खांद्यावर घेतो!

धनंजयना पंकजा म्हणाल्या विकासासाठी शुभेच्छा, तर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर

गहिनीनाथगडावर मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर, ‘आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात’, पंकजांचे वक्तव्य

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.