AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून ‘यू टर्न’ घेऊन ‘वर्षा’वर सरेंडर होणार? कोणी केला मोठा दावा

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. त्याच्यामुळे युतीच्या उमेदवारास फटका बसला. तिसरा आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू मांडवली करून चुपचाप बसले आहेत. दुसरीकडे ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा मागत आहे.

बच्चू कडू तिसऱ्या आघाडीतून 'यू टर्न' घेऊन 'वर्षा'वर सरेंडर होणार? कोणी केला मोठा दावा
bacchu-kadu
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 18, 2024 | 2:24 PM
Share

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले आमदार बच्चू कडू महायुतीच्या विरोधात उतरले आहे. त्यांनी राज्यात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील राजकारणात मोठा भूकंप होईल, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. आता बच्चू कडू यांच्यावर त्यांच्या जिल्ह्यातील विरोधक आणि अपक्ष पण भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी हल्ला केला आहे.

तिसरी आघाडी फ्लॉप होणार

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीच्या प्रयोगावर आमदार राणा यांनी टीकेचा आसूड ओढला आहे. बच्चू कडू यांची तिसरी आघाडी पूर्णपणे फ्लॉप होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

बच्चू कडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हणतात की, अचलपूरमध्ये मला पाठिंबा द्या. मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना पाठिंबा द्या. परंतु काही दिवस थांबा. बच्चू कडू कधी पण तिसरी आघाडीतून ‘यू टर्न’ घेऊन वर्षा बंगल्यावर सरेंडर होतील, हे तुम्हाला दिसणार आहे.

लोकसभेत बच्चू कडूंमुळे मतविभाजन

लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्यामुळे मतांचे विभाजन झाले होते. त्याच्यामुळे युतीच्या उमेदवारास फटका बसला. तिसरा आघाडीच्या माध्यमातून बच्चू कडू मांडवली करून चुपचाप बसले आहेत. दुसरीकडे ते एकनाथ शिंदेंना पाठिंबा मागत आहे. गेल्या वीस वर्षांत बच्चू कडू यांच्या मतदार संघात विकास कामे झाले नाही. ते गारुडी असणारे व्यक्तीमत्व आहे, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला.

काय म्हणाले बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील राजकारणात ४ नोव्हेंबरला भूंकप होणार असल्याचा दावा केला. अनेक चांगले उमेदवार आमच्याकडे येणार आहेत. युती आणि आघाडी या दोघांना आम्ही पराभूत करणार आहोत. सर्वत्र तिसऱ्या आघाडीचा डंका दिसणार आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते.

Follow Us
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ