AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई भाजप अध्यक्षांनी पोलिसांची लाज काढली, आई-बहिणीवरून शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साटम मुंबई पोलिसांना शिवीगाळ करत, गरीब उत्तर भारतीयांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा व्हिडिओ चित्रे यांनी शेअर केला.

मुंबई भाजप अध्यक्षांनी पोलिसांची लाज काढली, आई-बहिणीवरून शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Akhil Chitre amit satam
| Updated on: Nov 23, 2025 | 2:46 PM
Share

राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्यात निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळत आहे. यानंतर आता सध्या मुंबई महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अमित साटम हे त्यांच्या पदावर राहण्याच्या योग्यतेचे नाही, असा आरोप अखिल चित्रे यांनी केला आहे.

अखिल चित्रे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अमित साटम यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अमित साटम हे मुंबई पोलिसांची लाज काढताना, त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. तसेच यावेळी अमित साटम हे गरीब उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी देतानाही दिसत आहे. यावरुन अखिल चित्रे यांनी अमित साटम यांच्यासारख्या व्यक्तीला मुंबई अध्यक्षपदी ठेवणे कितपत योग्य आहे, असा सवाल केला आहे.

अखिल चित्रे काय म्हणाले?

मुंबई पोलिसांची लाज काढली जात असेल, गरीब उत्तर भारतीयांना जीवानिशी मारण्याची धमकी दिली जात असेल आणि ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ म्हणणाऱ्यांकडून आई-बहिणींवरून अर्वाच्य, अश्लाघ्य शिव्या ऐकाव्या लागणार असतील… तर अशा अमानुष, शिवराळ अमित साटम इसमाला मुंबई भाजपा अध्यक्षपदी ठेवणं कितपत योग्य? ‘देवा’ आता तूच भाजपाला सुबुद्धी दे… नाहीतर मराठी संस्कारात वाढलेले मुंबईकरच भाजपाला काही दिवसात वठणीवर आणतील !, असे अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.

दरम्यान अमित साटम हे पूर्वीपासूनच वादग्रस्त वक्तव्ये आणि कथित गैरवर्तनामुळे चर्चेत राहिले आहेत. २०१७-१८ दरम्यान साटम यांच्यावर बीएमसी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचे आणि धमक्या दिल्याचा आरोप होता. बीएमसी कर्मचाऱ्याला अपशब्द वापरल्याची कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. तसेच २०१७ मध्ये त्यांच्यावर फेरीवाल्यांना मारहाण आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. आता या नवीन व्हिडीओमुळे मुंबई भाजपसाठी हा एक मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

अखिल चित्रे यांच्या या गंभीर आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच अमित साटम यावर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.