AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी सरकारचे कांदा उत्पादकांसाठी एका दिवसांत दोन निर्णय, नाशिकच्या बाजारपेठेत कांदा वधारला

भाजप नेते देवेंद्र फडणीस यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याचे दर स्थिर राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. आतापर्यंत कच्च्या तेलावर कुठलेही आयात शुल्क नव्हते. ते आयात शुल्क 20 टक्के करण्यात आले आहे. रिफाइंड तेलावर साडेबारा टक्क्यांवरून साडे बत्तीस टक्के आयात शुल्क करण्यात आले आहे.

मोदी सरकारचे कांदा उत्पादकांसाठी एका दिवसांत दोन निर्णय, नाशिकच्या बाजारपेठेत कांदा वधारला
onion
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 14, 2024 | 12:27 PM
Share

लोकसभा निवडणुकीत कांद्याने महायुतीचा वांदा केला होता. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे परिणाम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ग्राहक हिताचा विचार करत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणले होते. कांद्यावर प्रती टन साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य लादले होते. तसेच 40 टक्के निर्यात शुल्कसुद्धा लादले होते. आता राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर लादलेले साडेपाचशे डॉलर निर्यात मूल्य रद्द केले आहे. तसेच अर्थ मंत्रालयाने 40 टक्के निर्यात शुल्क निम्म्यावर आणत 20 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या दरात नाशिकमधील बाजारपेठेत वाढ झाली आहे. नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत शनिवारी एकाच दिवसात कांद्याच्या दरात 400 रुपयांची वाढ प्रतिक्विंटल झाली आहे.

लासलगावमध्ये कांदा वधारला

लासलगाव बाजारपेठेत कांद्याला 3900 ते 4400 रुपये दर होतो. तो शनिवारी 4300 ते 4800 रुपयांपर्यंत गेला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एकाच दिवसांत दोन मोठे निर्णय घेतल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. सरकारला हे उशिरा आलेले शहाणपण आहे. पण आता हा निर्णय कायमस्वरूपी ठेवावा, अशी संमिश्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

शेतकरी नेते अजीत नवले यांनी कांद्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क घटवण्याचा निर्णय घेण्यास उशीर केला. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये तोटा झाला आणि कांदा निर्यात धोरणामुळे तोटा होवू नये यासाठी राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचे नवले यांनी म्हटले आहे.

onion

किसान सभेची मागणी

शेतमालाला कोणतेही बंधने केंद्र सरकारने टाकू नये. विशेषत : कांद्यावर कोणतेही शुल्क लागणार नाही, अशा प्रकारचा निर्णय यापुढे घ्यावा, अशी अपेक्षा किसान सभेचे नेते अजीत नवले यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळावा म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे

कांद्याचे दर स्थिर राहणार

भाजप नेते देवेंद्र फडणीस यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कांद्याचे दर स्थिर राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली. आतापर्यंत कच्च्या तेलावर कुठलेही आयात शुल्क नव्हते. ते आयात शुल्क 20 टक्के करण्यात आले आहे. रिफाइंड तेलावर साडेबारा टक्क्यांवरून साडे बत्तीस टक्के आयात शुल्क करण्यात आले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सोयाबीनच्या किमती बाजारात वाढण्याकरिता त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच सोयाबीनच्या खरेदीचा निर्णय केंद्राने घेतला आहे. तसेच बासमती राईसच्या एक्सपोर्टवर जी ड्युटी होती ती रद्द केली आहे. त्यामुळे बासमती धान पिकवणारा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं