AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालावर मोदींनी पुन्हा दिला ‘एक है तो सेफ है’ चा नारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील विजयानंतर कार्यकर्त्यांना संबोधित केले. महाराष्ट्रातील जनतेने महाविकासआघाडीला त्यांची जागा दाखवली आहे. त्यांनी संपूर्ण देशाला एकच संदेश दिला आहे की, देशात एकच संविधान चालेल. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर देखील टीका केलीये.

महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालावर मोदींनी पुन्हा दिला 'एक है तो सेफ है' चा नारा
| Updated on: Nov 23, 2024 | 8:53 PM
Share

PM Modi on maharashtra election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोदींनी महाराष्ट्राचा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. जय भवानीच्या घोषाने पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. मोदी म्हणाले की, ज्यांना महाराष्ट्राची माहिती आहे, त्यांना हे कळेल की, तिथे आपण ‘जय भवानी’ म्हणतो तेव्हा ‘जय शिवाजी’चा नाराही एकाच वेळी गुंजतो. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रात ‘महाविजय’ साजरा करत आहोत. आज महाराष्ट्रात ‘विकासाचा विजय झाला आहे. सामाजिक मूल्यांचाही विजय झाला आहे. राज्यात लबाडी आणि विश्वासघाताचा पराभव झाला आहे. आज नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा पराभव झालाय.

गेल्या ५० वर्षांतील कोणत्याही पक्षाचा आणि आघाडीचा हा सर्वात मोठा विजय आहे. महाराष्ट्रात भाजपचा हा सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा विजय आहे. सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश मिळाला आहे. गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि अगदी बिहारमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपची सरकारे निवडून आली आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘काँग्रेस आणि आघाडीचे कोणतेही खोटी आश्वासने चालली नाही. आज महाराष्ट्रातील जनादेशाने आणखी एक संदेश दिला आहे की, संपूर्ण देशात एकच संविधान चालेल. ते संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान. जे लोकं देशात दोन संविधानाची भाषा करतील त्यांना देश नाकारेल. काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण महराष्ट्राने त्यांना संदेश दिलाय की हे नाही चालणार. जगातील कोणतीही ताकद कलम ३७० परत लागू करु शकणार नाही.’

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, इंडिया आघाडी ही समाजात जाती आणि धर्माच्या नावावर फूट पाडते. या निवडणुकीने आणि हरियाणाच्या निकालाने दाखवून दिले आहे की लोकांना कोण बरोबर आहे हे कळतं. महाराष्ट्राचा निर्णय केवळ 2024 चा नाही, तर 2019 मध्येही मिळाला होता. पण तेव्हा उद्धव यांचे सत्तेवरील आंधळे प्रेम आणि विश्वासघात जिंकला होता. आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.

नड्डा म्हणाले की, ज्या लोकांनी देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला ते निवडणूक हरले आहेत. काँग्रेसवर निशाणा साधत नड्डा म्हणाले की, काँग्रेस आघाडी जाती आणि धर्माच्या नावावर समाजात फूट पाडेल या भ्रमात आहे. पंतप्रधानांनी जगभरात आपली छाप सोडली आहे, विशेषत: तीन देशांच्या भेटीनंतर. मोदींनी पाठवलेल्या संदेशाचे जगाने कौतुक केले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.