धो धो धो…पावसामुळे धरणं भरणार, नद्यांना पूर, पाऊस बरसणार; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!
मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल. अतिवृष्टी होऊ शकते.

Monsoon Update : राज्यात येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात 8 तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, सांगली जिल्हा, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील लोकांसाठी खुशखबर आहे. आगामी तीन दिवसांत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस दोन ते तीन दिवस पडेल. त्यानंतर या भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस असेल. तसेच राज्यात मात्र 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस होणार आहे, असेही डख यांनी सांगितले.
मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस
मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल. अतिवृष्टी होऊ शकते. पुण्यातही अतिवृष्टी होऊ शकते. शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री या पट्ट्यातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात पासवाची कशी स्थिती?
नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचे उशिराने आगमन होईल. या भागातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठा पाऊस होईल. पहिल्याच पावसात ओढे, नाले दुथडी भरून वाहणार. बंधारे भरून वाहतील. गुजरातच्या सीमेकडील भागात उशिरा पाऊस येईल. पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांत आठ जुलैपर्यंत रोज पाऊस पडेल. वेगवेगळ्या भागात हा पाऊस असेल. जमिनीत ओल असेल तर पेरणी करून घ्यावी अन्यथा 10 जुलैपर्यंत थांबावे लागेल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
अहिल्यानगरातील धरणं भरून जातील
विदर्भातही आठ जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस होईल. वर्धा, नागपूर, वाशीम, भंडारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती या भागातील शेतकऱ्यांनी जमिनीत ओल झाली की पेरणी करून टाकावी. अहिल्यानगरातील धरणं भरून जातील. ज्या भागात अजूनही पाऊस आलेला नसेल तर एक आणि आठ जुलै या काळात त्या भागात पाऊस पडू शकतो, असे डख यांनी सांगितले आहे.
