AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्रेकनंतर मान्सून कधी सक्रीय होणार? हवामान विभागाकडून पावसासंदर्भात महत्वाची माहिती

महाराष्ट्रातील अनेक भागांत मान्सूनने ब्रेक घेतला आहे. परंतु आता मान्सून सक्रीय होणार आहे. तसेच राज्यातील काही भागांत ९ आणि १० जून रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे.

ब्रेकनंतर मान्सून कधी सक्रीय होणार? हवामान विभागाकडून पावसासंदर्भात महत्वाची माहिती
मान्सून Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 09, 2025 | 7:17 AM
Share

मे महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सध्या ब्रेक घेतला आहे. राज्यातील अनेक भागांत शेतकरी मान्सून सक्रीय होण्याची वाट पाहत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तेरकडील जिल्ह्यात मान्सून अद्याप दाखल झाला नाही. हवामान विभागाने मान्सूनसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. १३ जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होणार आहे. तसेच राज्यातील काही भागांत ९ आणि १० जून रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे.

राज्यातील कोकण-गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसह घाट विभागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे

वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा कायम आहे. यामुळे सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे व घाट विभाग, अहिल्यानगर, कोल्हापूर व घाट विभाग, सातारा व घाट विभाग, तसेच सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० वादळी वेगाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

पुण्यातील खडकवासला जलसाठा वाढला

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये आज दिवस अखेर एकूण ५.४७ टीएमसी १८.७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरण साखळीत ४.४२ टीएमसी म्हणजे १५.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण साखळीत एक टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. ही दिलासादायक बाब आहे. एक जूनपासून येथे एकूण ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

  • खडकवासला धरणात ०.७८ टीएमसी म्हणजे ३९.२९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
  • पानशेत धरणात याच कालावधीत १९ मिलिमीटर पाऊस झाला. एक जूनपासून येथे ४८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सध्या पानशेत धरणात १.७५ टीएमसी म्हणजे १६.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
  • वरसगाव धरणात याच कालावधीत १७ मिलिमीटर पाऊस झाला. एक जूनपासून ४९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वरसगाव धरणात सध्या २.७६ टीएमसी म्हणजे २१.५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
  • टेमघर धरणात अजिबात पाऊस झालाच नाही. एक जूनपासून येथे एकूण ४१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या धरणात केवळ ०.१८ टीएमसी म्हणजे ४.८०टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.