AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे संतापल्या, थेट, म्हणाल्या…

मुंबईच्या महापाैर रितू तावडे सतत ट्रोल होत आहेत. नुकताच त्यांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यादरम्यान रितू तावडे यांनी नक्की काय घडले हे सांगितले. यासोबतच त्यांनी थेट संताप व्यक्त केला.

त्यांच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे संतापल्या, थेट, म्हणाल्या...
Ritu Tawde
| Updated on: Apr 01, 2026 | 1:42 PM
Share

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक विधान केले आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार झाला, असे रितू तावडे म्हणाल्या होत्या. रितू तावडे यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. अशोक खरात प्रकरण ताजे असताना रितू तावडे यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली. सतत टीका होत असल्याने आता रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. रितू तावडे यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याचेही त्यांनी म्हटले. अंधश्रद्धेचा हा विषय नाही तर श्रद्धेचा विषय असल्याचेही त्यांनी म्हटले. रितू तावडे यांनी म्हटले की, जैनमुखींच्या त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

गुरूदेव नम्रमुनी महाराज यांना मी भेटले मला गळ्याचा त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितले. ज्यावेळी आपण ओमचा उच्चार करतो, त्यावेळी आपल्या गळ्याचा एक व्यायाम होतो आणि गळ्याला आराम मिळतो. घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह, नगरसेविका राखी जाधव, धर्मेश गिरी आम्ही त्यावेळी गुजरातमध्ये त्यांचा आर्शिवाद घेण्याकरिता गेलो होतो.

त्यावेळी त्यांनी आमच्याकडून ओमचा उच्चार करून घेतला होता. मी सातत्याने रोज उठून सतत ओमचा उच्चार करत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, आज माझा गळा चांगला झाला. मी ती माझी भावना व्यक्त केली. याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचे काम नव्हते. स्वामी समर्थ महाराज, साईबाबा आम्ही सर्व भक्त आहोत. आदरनीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतो.

मी घरी पोहोचले नाही, त्यापूर्वीच अशाप्रकारच्या न्यूज लावल्या गेल्या. अतिशय घाणेरडे, किळस वाटते मला या गोष्टींची.. तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय? मला खरोखर वाईट वाटतंय, असेही रितू तावडे यांनी म्हटले. पुढे बोलताना रितू तावडे यांनी म्हटले की, काल ते जे बोलले ते कुठेच आले नाही. त्या कार्यक्रमाबद्दल कुठेच आले नाही. जे ट्रोल करतात.. त्यांच्या घरी काही आयाबहिणी आहेत की नाही? असाही सवाल रितू तावडे यांनी केला. कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करतात? खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करता..

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?