AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत एकनाथ शिंदे किती स्ट्रॉंग? आतापर्यंत किती नगरसेवकांची साथ? आकडे काय सांगतात ?

तीन वर्षांपूर्वीच्या शिवसेना फुटी आणि एकनाथ शिंदे यांच्या उदयानंतर, त्यांच्या शिवसेनेचे मुंबईतील वर्चस्व वाढत आहे. 2017पासून 60 पेक्षा जास्त नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, यात ठाकरे गटाचे 45 नगरसेवक समाविष्ट आहेत.

मुंबईत एकनाथ शिंदे किती स्ट्रॉंग? आतापर्यंत किती नगरसेवकांची साथ? आकडे काय सांगतात ?
मुंबईत एकनाथ शिंदे किती स्ट्रॉंग?Image Credit source: social media
| Updated on: Aug 04, 2025 | 8:41 AM
Share

तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना फुटून दोन भाग झाले. ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटांत सातत्याने आरोप-प्रत्यारोप, वर्चस्वाचे राजकारण सुरू असतं. 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन शिंदे बाहेर पडले, आणि भाजपच्या साथीला जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं.  त्यानंतर ते जवळपास अडीच वर्षं, राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. तेव्हापासूनच शिंदेंची पॉवर हळूहळू वाढू लागली असून दिवसेंदिवस ते स्ट्राँग होत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष झडझडून कामाला लागले असून प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता मुंबईत शिवसेना शिंदे गट, एकनाथ शिंदे किती स्ट्राँग झालेत ते समोर येत आहे. 2017 ते 2022 या 5 वर्षांच्या काळात विविध पक्षाच्या 60 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे , यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक, म्हणजे 45 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 6, एमआयएम 2, समाजवादी पक्ष 1, मनसे 1 या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काय सांगते आकडेवारी ?

मुंबई महापालिकेतील सध्याचे राजकीय बलाबल पाहूया.

मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. निकालानंतर 4 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या 88 झाली होती. पुढे मनसेचे 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेनेकडील नगरसेवकांची संख्या 94 झाली. त्यानंतर 2022 पर्यंत शिवसेनेचे आणखी 5 नगरसेवक वाढले. शिवसेनेकडे एकूण 99 नगरसेवक होते.

2017 च्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आले होते. त्याखालोखाल भाजपचे 82 नगरसेवक जिंकले होते. काँग्रेसचे 31 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक आणि मनसेचे 7 नगरसेवक, समाजवादी पक्षाचा 1 नगरसेवक व 14 अपक्ष नगरसेवक झाले होते.

वर्ष 2012-2017 मधील 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 15, काँग्रेस 8, मनसे 5, अपक्ष 2, समाजवादी पक्ष 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अखिल भारतीय सेनेच्या एका माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला.

तर वर्ष 2007-2012 मधील 14 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचा समावेश आहे. वर्ष 2002-2007 मधील 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा समावेश आहे. 2002 सालापूर्वीच्या 12 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक, भाजप 2, राष्ट्रावादी काँग्रेस 1, काँग्रेस 2, मनसे 1 या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.