AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर याद राखा, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला इशारा

अनिल परब यांनी तक्रार केल्यानंतर समिती बसवली. हा कसा कारभार चाललाय. तुम्हाला राग येतोय की नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारलं.

...तर याद राखा, आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला इशारा
| Updated on: Jul 01, 2023 | 6:20 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेची ही वास्तू आर्थिक केंद्र आणि शक्तीपीठ आहे. या वास्तूवर भगवाच असेल. त्याचा आवाजदेखील दिल्लीला ऐकावा लागतो. मुंबईची आज परिस्थिती काय आहे? गेल्या 25 वर्षात आपण जी कामं केली आहेत ती करुन दाखवलं आहे. पण एक वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक, कमिट्या, चेअरमन नाहीत. दाराला कुलूप लावलेले आहेत. प्रशासक आहेत. तुमचा आवाज त्यांना ऐकू येतंय का? तुमची चिंता त्यांना आहे का? तुम्ही मुंबईकर आहात. तुम्ही बिल्डर म्हणून आला तर रेड कारपेट टाकलं जाईल. पण नागरिक म्हणून आला तर वेळ नाहीय. खोके घ्यायचा वेळ आला आहे. असा आरोप ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

उत्तर द्यायचं नाही असे धोरण

आदित्य ठाकरे म्हणाले, मला अधिकारी फोन करून सांगतात की, निवडणुका लावायचा प्रयत्न करा. तुम्ही असताना कामं व्हायची. पण आता चोरी केली जातेय. त्यामुळे या चोरांना आपल्याला पळवायचं आहे. जानेवारीपासून मी वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न केला. हेच निवेदन आम्ही मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना दिले. मी आमदार म्हणून धमकी दिली नाही तोपर्यंत त्यांच्याकडून उत्तर आलं नाही. आदित्य ठाकरे यांचं पत्र आलं की उत्तर द्यायचं नाही, हे धोरण आहे.

एसआयटी लावा, घोटाळे बाहेर येतील

मी नवीन राज्यपालांकडे गेलो. नव्या राज्यपालांकडे तक्रार केली. लोकायुक्तांकडे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. त्यांनी याबाबत आपण विचार करु, असं सांगितलं. पण अजून झालं नाही. मुंबईवर एसआयटी लावली तशी ठाणे, नागपूर, पुणे महापालिकांवर लावा. घोटाळेच केले आहेत. दुसरं काहीच केलेलं नाही.

मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर…

मुंबईत सगळं काही आम्ही ऐकून घेऊ. पण, मुंबईकरांच्या पैशाला हात लावाल तर याद राखा. पाच हजार बाथरूम नसताना पाच हजार मशीन विकत घ्यायला काढताय. २३ हजार रुपयांचं मशीन ७२ हजार रुपयांना खरेदी करण्याचा यांचा प्रयत्न आहे. अनिल परब यांनी तक्रार केल्यानंतर समिती बसवली. हा कसा कारभार चाललाय. तुम्हाला राग येतोय की नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना विचारलं.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.