AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania : ‘त्यांनी असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे’, अंजली दामानिया संतापल्या, दिला असा इशारा

Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा पारा चढला आहे. महिलांनी राजकारणात काही बोललं की, त्यांच्यावर फालतू डायलॉग मारले जातात, असा आरोप करत दमानिया यांनी यापुढे अशा लोकांना सोडणार नसल्याचा सज्जड दम दिला आहे.

Anjali Damania : 'त्यांनी असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे', अंजली दामानिया संतापल्या, दिला असा इशारा
अंजली दमानियांचा संताप
| Updated on: May 29, 2024 | 5:15 PM
Share

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सिंचन घोटाळ्यापासून तर अनेक प्रकरणात त्यांची भूमिका मांडली. त्यांची भूमिका अनेकांना अडचणीची ठरली. आता दमानिया यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्या, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. ‘त्यांनी असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे’, असा सज्जड दम त्यांनी दिल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असा प्रकार पुन्हा झाल्यास त्या व्यक्तीला आपण सोडणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा हा इशारा नेमका कुणाला आहे?

तर मी सोडणार नाही

राजकारणात यांना महिलेने काही बोललेलं अजिबात खपत नाही. अशा महिलेला बाजूला करायचा असेल तर तिच्याबद्दल खालच्या दर्जाचा आणि वाटेल ते बोलले जाते. सुरज चव्हाण आणि अजित पवारांना माझं वॉर्निंग आहे. त्यांनी जी भाषा आता वापरली ही बाई काय रिचार्ज वर काम करते सुपारी घेते, असले फालतू डायलॉग त्यांच्या खिशात ठेवावे. यापुढे त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे, नाही तर मी त्यांना सोडणार नाही, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

राजकारण्यांना यापुढे प्रश्न विचारायचे नाहीत का?

आता राजकारणात सगळ्यांना धडे हे शिकवलेच पाहिजेत. आम्ही जे प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून मिळाले पाहिजेत. जर तुम्ही खालच्या दर्जाची स्टेटमेंट केली तर यापुढे तुम्हाला सोडणार नाही. ही सुद्धा अद्दल तुम्हाला घडवायला पाहिजे म्हणून मला त्याची प्रतिक्रिया हवी आहे . त्यांच्याच पक्षातील रूपाली चाकणकर, चित्राताई वाघ, विरोधी पक्षातील सुप्रिया सुळे, प्रियंका चतुर्वेदी आहे या सगळ्यांकडून आपल्याला उत्तरं हवी आहेत. याच्यापुढे राजकारण्यांना महिलेने प्रश्न विचारायचे नाहीत का? प्रश्न विचारले म्हणूनतुम्ही असली थर्ड ग्रेड स्टेटमेंट राजकारणात खपवून घेणार का? असा प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे.

घोटाळ्यातील पैसा परत घेणार का?

मोदींनी एक ट्विट केले ते वाचून दाखवते, ‘जिसने खाया है उससे बाहर निकालूंगा जिसका खाया है उसको लौटाऊंगा’ हे ऐकल्यावर इतकं समाधान झालं. मोदींची गॅरंटी त्यांनी परत परत जनतेला दिली ही पण गॅरंटी आहे का आणि असेल तर महाराष्ट्राचे 70 हजार चा जो स्कॅम झाला नंतर तो एक लाख दहा हजार कोटीपर्यंत गेला.त्या सिंचन घोटाळ्याचे पैसे अजित पवारांकडून परत घेणार का आणि महाराष्ट्राला परत देणार का हा सगळ्यात मोठा सवाल आहे, असे दमानिया म्हणाल्या.

सुरज चव्हाण यांनी काय केले होते आरोप

अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते सुरज चव्हाण यांनी केली होती. त्या नेत्या नाहीत रिचार्जवर चालणारी बाई आहे. सुपारी मिळाली की मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासाचा अशी माझी सरकारकडे मागणी आहे, दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे, असे चव्हाण म्हणाले होते.

खोलात जायला लावू नका

सुषमा अंधारे, रविंद्र धंगेकर प्रसिद्धीसाठी पुणे प्रकरणात अतिरेक करत आहेत, दोघेही चमको नेते आहे. या दोघांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला खोलात जायला लावू नका, असा इशारा चव्हाण यांनी दिला.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.