AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं…’, आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना फार मतदान होणार नाही. उलट ठाकरे गटातच दुफळी निर्माण होईल आणि त्यांची मते भाजपच्या उमेदवाराला मिळतील, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केलाय.

'मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं...', आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा
आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 13, 2024 | 10:46 PM
Share

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात लढत आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आज मुंबईत रंगशारदा नाट्यगृह येथे विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना पूर्ण मतं पडणार नाहीत. त्यांच्यात दुफळी निर्माण झाल्यामुळे त्यांची सर्व मतं आपले उमेदवार किरण शेलार यांना पडतील, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केला. “देवेंद्रजी हे रंग शारदेचं नाट्यगृह फिरतं झालेलं आहे. काल एका पक्षाचा मेळावा, आज सकाळी एका पक्षाचा मेळावा आणि आता आपला विजयी संकल्प मेळावा सुरु आहे. आपले किरण शेलार उभे आहेत. विचाराने ते संघ विचाराचे पक्के आहेत. गिरण गावात राहणारे आहेत. सुशिक्षित आहेत, लेखक आहेत”, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.

“देवेंद्रजींना मी अजून एका गोष्टीला मानलं. शेलार आहेत म्हणून म्हणत नाही, देवेंद्रजी यांनी हिरा शोधताना बरोबर निवडला. ज्या भागातून निवडला त्या भागाचं नाव वरळी विधानसभा आहे. काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की युवासेनेने नोंदणी केली आहे. ते मतदान अनिल परब यांना देणार नाहीत. मी पहिला गौप्यस्फोट करतोय की, त्यांची सर्व मतं शेलार यांना पडणार आहेत आणि त्यांच्यात दुफळी निर्माण होणार आहे. उबाठाची वरळीतील मतं अनिल परब यांना मिळणार नाहीत. त्यांच्यात दुफळी झालेली आहे”, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केला.

‘उद्धवजी यांचं असं झालंय, केळीचं झाड लावायचं आणि…’

“रंगमंच फिरता. त्यामध्ये उबाठा गटाचं भाषण पाहिले तर आम्ही तरुणांसाठी काय करणार आहोत? यावर काहीच भाष्य केलं नाही. कालच्या मेळाव्यात उद्धवजी म्हणाले, देवेंद्रजी मला खरंतर बोलायचं नव्हतं, उद्धवजी यांचं असं झालंय, केळीचं झाड लावायचं आणि त्याला रताळी आली की विचारायचं. तुमचं भाषण पूर्ण होण्याआधी तिकडे दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं”, असं आशिष शेलार म्हणाले.

“माझा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की, तुम्ही कुठे आहात? असं लोक प्रश्न विचारत आहेत. हे सर्व सार्वजनिक कार्यक्रमात जायला तयार नाहीत. मोदीजींनी शेतकऱ्यांना फटाफट मदत केली. सकाळी मनसेचा मेळावा झाला. त्यातलं एक वाक्य लिहून आणलं आहे. उद्धवजींना मराठी माणसाने केव्हाच नाकारले आहे”, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

“याकूब मेमनची कबर सजवणाऱ्या काही मुस्लिम बांधवांना तर शिवसेना भवनमध्ये जाऊन झालं गेलं विसरून जावा असं म्हणत होते. आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. तेव्हा तिकडे काही मुस्लिम बांधव शुभेच्छा द्यायला गेले होते. तिथं मुस्लिम बांधवाणी नंगी तलवार दिली ही तलवार जर हिंदू बांधवांवर उगरायला दिली असेल तर हे भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत”, असं आशिष शेलार म्हणाले.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.