AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं…’, आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना फार मतदान होणार नाही. उलट ठाकरे गटातच दुफळी निर्माण होईल आणि त्यांची मते भाजपच्या उमेदवाराला मिळतील, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केलाय.

'मी पहिला गौप्यस्फोट करतोय, त्यांची सर्व मतं...', आशिष शेलार यांचा ठाकरे गटाबाबत मोठा दावा
आशिष शेलार आणि उद्धव ठाकरे
| Updated on: Jun 13, 2024 | 10:46 PM
Share

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात लढत आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आज मुंबईत रंगशारदा नाट्यगृह येथे विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गटाबाबत मोठा दावा केला. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांना पूर्ण मतं पडणार नाहीत. त्यांच्यात दुफळी निर्माण झाल्यामुळे त्यांची सर्व मतं आपले उमेदवार किरण शेलार यांना पडतील, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केला. “देवेंद्रजी हे रंग शारदेचं नाट्यगृह फिरतं झालेलं आहे. काल एका पक्षाचा मेळावा, आज सकाळी एका पक्षाचा मेळावा आणि आता आपला विजयी संकल्प मेळावा सुरु आहे. आपले किरण शेलार उभे आहेत. विचाराने ते संघ विचाराचे पक्के आहेत. गिरण गावात राहणारे आहेत. सुशिक्षित आहेत, लेखक आहेत”, असं देखील आशिष शेलार यावेळी म्हणाले.

“देवेंद्रजींना मी अजून एका गोष्टीला मानलं. शेलार आहेत म्हणून म्हणत नाही, देवेंद्रजी यांनी हिरा शोधताना बरोबर निवडला. ज्या भागातून निवडला त्या भागाचं नाव वरळी विधानसभा आहे. काही दिवसांपूर्वी बातम्या येत होत्या की युवासेनेने नोंदणी केली आहे. ते मतदान अनिल परब यांना देणार नाहीत. मी पहिला गौप्यस्फोट करतोय की, त्यांची सर्व मतं शेलार यांना पडणार आहेत आणि त्यांच्यात दुफळी निर्माण होणार आहे. उबाठाची वरळीतील मतं अनिल परब यांना मिळणार नाहीत. त्यांच्यात दुफळी झालेली आहे”, असा मोठा दावा आशिष शेलार यांनी केला.

‘उद्धवजी यांचं असं झालंय, केळीचं झाड लावायचं आणि…’

“रंगमंच फिरता. त्यामध्ये उबाठा गटाचं भाषण पाहिले तर आम्ही तरुणांसाठी काय करणार आहोत? यावर काहीच भाष्य केलं नाही. कालच्या मेळाव्यात उद्धवजी म्हणाले, देवेंद्रजी मला खरंतर बोलायचं नव्हतं, उद्धवजी यांचं असं झालंय, केळीचं झाड लावायचं आणि त्याला रताळी आली की विचारायचं. तुमचं भाषण पूर्ण होण्याआधी तिकडे दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं”, असं आशिष शेलार म्हणाले.

“माझा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की, तुम्ही कुठे आहात? असं लोक प्रश्न विचारत आहेत. हे सर्व सार्वजनिक कार्यक्रमात जायला तयार नाहीत. मोदीजींनी शेतकऱ्यांना फटाफट मदत केली. सकाळी मनसेचा मेळावा झाला. त्यातलं एक वाक्य लिहून आणलं आहे. उद्धवजींना मराठी माणसाने केव्हाच नाकारले आहे”, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

“याकूब मेमनची कबर सजवणाऱ्या काही मुस्लिम बांधवांना तर शिवसेना भवनमध्ये जाऊन झालं गेलं विसरून जावा असं म्हणत होते. आज आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. तेव्हा तिकडे काही मुस्लिम बांधव शुभेच्छा द्यायला गेले होते. तिथं मुस्लिम बांधवाणी नंगी तलवार दिली ही तलवार जर हिंदू बांधवांवर उगरायला दिली असेल तर हे भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत”, असं आशिष शेलार म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.