AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना खुशखबर, बेस्टचं किमान तिकीट 5 रुपये

बेस्ट बस दरकपातीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  त्यानुसार बेस्टचं किमान भाडं ८ रुपयांवरुन ५ रुपये करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईकरांना खुशखबर, बेस्टचं किमान तिकीट 5 रुपये
| Updated on: Jun 25, 2019 | 4:18 PM
Share

मुंबई : बेस्ट बस दरकपातीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  त्यानुसार बेस्टचं किमान भाडं ८ रुपयांवरुन ५ रुपये करण्यात आले.  मुंबईतील बेस्ट भवनात आज (25 जून) झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. नव्या प्रस्तावानुसार आता प्रवाशांना पाच किमीसाठी केवळ 5 रुपयाची तिकीट काढावी लागणार आहे.  त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी हा नव्या भाडेदराचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार पाच किलोमीटर अंतरासाठी किमान भाडे पाच रुपये निश्चित करण्यात आले होते. सध्या बससाठी पहिल्या 5 किमीला 5 रुपये तर एसी बससाठी 6 रुपये किमान तिकीट दर असेल असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेस्ट उपक्रमाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेने सहा महिन्यांसाठी 600 कोटी रुपये देण्याचे नुकतेच मान्य केले होते. मात्र तीन महिन्यांत प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढ हे दोन बदल दिसले पाहिजेत, अशी अट घातली होती. तसेच बेस्टचे किमान भाडे पाच रुपये करण्याचा आदेश करारात सामाविष्ट करण्यात आला होता. हे बदल न झाल्यास अनुदानाचा हप्ता देण्यात येणार नाही, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.  त्यानुसार बेस्ट उपक्रमाने दरकपातीचा प्रस्ताव तयार केला होता.

नवीन प्रस्तावानुसार, प्रौढ आणि लहान मुलांसाठी भाडेदर सारखेच राहतील.  दरकपातीच्या प्रस्तावानुसार चार टप्प्यानुसार तिकीट दर ठरवण्यात येतील. त्यानुसार 5 किमी, 10 किमी, 15 किमी आणि त्यापुढे असे हे चार टप्पे असतील. त्यानुसार 5 किमीपर्यंत 5 रुपये, 10 किमीपर्यंत 10 रुपये, 15 किमीला 15 रुपये आणि त्यापुढील टप्प्याला 20 रुपये तिकीट दर असेल.  एसी बसचे प्रवास आणि तिकीटाचे टप्पे वेगळे असतील.

संबंधित बातम्या :

मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा, 5 किमीसाठी केवळ 5 रुपये तिकीट

मुंबई : बेस्ट बस वाचवण्यासाठी खालसा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या हटके आयडिया   

 ‘या’ 10 निकषांवर ‘बेस्ट’चा संप मागे 

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.