मुंबई : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी महाविकासआघाडी सरकार पडणार असल्याच्या भाजपच्या दाव्यावर सडकून टीका केलीय. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उपहासात्मक उल्लेख करत फडणवीसांनंतर चंपा देखील भाकित करत असल्याचा टोला लगावला. भाजपनं हातगुण, पायगुण पाहावा. ती त्यांची संस्कृती आहे, पण आमचा कर्तुत्वावर विश्वास आहे, असंही मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते (Bhai Jagtap criticize Chandrakant Patil for prediction about Government Formation in Maharashtra).