AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांचा पराभव, त्यांच्या आरोपांवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम काय म्हणाले?

Samadhan Sarvankar : "या सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन जागावाटप झालेलं आहे. जागावाटप झालं त्याबद्दल कोणाची नाराजी नाही. त्याबद्दल कोणीही चिंता व्यक्त केलेली नाही" असं अमित साटम म्हणाले.

Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांचा पराभव, त्यांच्या आरोपांवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम काय म्हणाले?
samadhan sarvankar
| Updated on: Jan 21, 2026 | 10:14 AM
Share

“शिवसेना-भाजपमधील संबंध अजिबात ताणले गेलेले नाहीत. काल खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस दावोसला आहेत, ते दावोसहून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. दिवसातून किमान एकदा त्यांच्यात राज्याच्या अनेक विषयाबरोबर महापालिका विषयावर चर्चा होते” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले. “महायुतीचे 118 नगरसेवक, नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होईल. महायुतीच्या 118 नगरसेवक, नगरसेविकांपैकी कोण महापौरपदी विराजमान होईल हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले चर्चा करुन ठरवतील” असं अमित साटम म्हणाले.

“महापालिकेत सर्व पदं महायुतीला मिळतील. भाजप, शिवसेना, रिपाई सर्व मिळून एकमेकांशी चर्चा करुन कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद कोणाला द्यायचं? त्या कमिटीला न्याय कोण देऊ शकेल? कोणाला अनुभव आहे? मुंबईला भ्रष्टाचाररहित प्रशासन द्यायचं आहे. मुंबई शहरात विकास घडवून आणायचा आहे. मुंबईची सुरक्षा अबाधित ठेवायची आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन निर्णय घेण्यात येईल. कुठलही सत्तेच स्थान काबीज करण्यासाठी निर्णय होणार नाही. मुंबईकरांचं जीवनमान चांगलं करण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय होईल” असं अमित साटम म्हणाले.

मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्यामुळे शिवसेना हरली का?

शिवसेनेला मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे. त्यावर अमित साटम म्हणाले की, “जागा वाटपाची डिटेल चर्चा झाली. कुठल्या वॉर्डात कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता निवडून येऊ शकतो. जनभावना काय आहे. कुठला पक्ष संघटनात्मक दृष्टया सक्षम आहे. हे पाहण्यात आलं. त्यानंतर निर्णय झाला” असं अमित साटम यांनी सांगितलं.

समाधान सरवणकर यांच्याबद्दल काय म्हटलं?

समाधान सरवणकर यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? यावरही ते बोलले. “समाधान सरवणकर फार कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी काही विषयांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी चिंता व्यक्ती केली, त्याबद्दल सत्यता तपासू. त्याची माहिती त्यांच्याकडून आणि इतरांकडून घेऊ. सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन निर्णय घेऊ. त्यांनी भाजपवर आक्षेप नोंदवलेला नाही. त्यांनी विशिष्ट लोकांवर आक्षेप नोंदवलाय” असं अमित साटम यांनी म्हटलं. “भाजपवर माझा आक्षेप नाही असं म्हटलय. त्यांचा निशाणा भाजपवर नाही. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. त्यांचा निशाणा काही व्यक्तींवर आहे. आपसात चर्चा केल्याने प्रश्न चांगल्यारितीने सुटू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी मीडियासमोर बोलणं टाळलं पाहिजे” असा सल्ला अमित साटम यांनी दिला.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड