धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला? फडणवीस यांनी पहिल्यांदाच सांगितलं कारण
CM Devendra Fadnavis Big Statement : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यांनी आजारपणाचे कारण पुढे केले, अजितदादांनी नैतिकतेचे कारण दिले. आता मुख्यमंत्र्यांनी त्यामागील कारणं स्पष्ट केले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. CID ने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांच्या हत्येच्या वेळेची छायाचित्र समोर आली नि महाराष्ट्रात आगडोंब उसळला. त्यानंतर धनंजय मुंडे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात आला. अजितदादांसह सरकारने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे पालूपद लावले. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आजारपणाचे कारण पुढे केले. त्यावरून वाद ओढावला. आज टीव्ही ९ च्या तिसर्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राजीनाम्याचे कारण स्पष्ट करत, अधिकृतपणे या वादावर पडदा टाकला. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये टीव्ही ९ तिसर्या मनी नाईन फायनान्शियल फ्रिडम समिटमध्ये टीव्ही ९...