AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज्यपाल भवन भाजप भवन झालं होतं”; काँग्रेसने भगतसिंह कोश्यारींची सगळी कुंडलीच मांडली

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून अनेकदा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केली गेली आहेत तयामुळेच त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करून त्यांना पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यपाल भवन भाजप भवन झालं होतं; काँग्रेसने भगतसिंह कोश्यारींची सगळी कुंडलीच मांडली
| Updated on: Jan 23, 2023 | 7:35 PM
Share

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी विरोधकांनी जोरदारपणे केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवाविषयी सातत्याने राज्यपाल यांच्याकडून अवमान केला जात होता. त्यामुळेच त्यांना राज्यातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाकडून केली जात होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनाम्याविषयी मत व्यक्त केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांची हकालपट्टी करून त्यांना राज्यातून पाठवून द्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजपच्या समर्थनाथ त्यांनी काम केल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, संविधानी व्यवस्थेला छेद देण्याच काम राज्यपाल करत असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर बेताल वक्तव्य केली होती.

त्यांची ही वक्तव्य म्हणजे भाजपसाठी काम करत असल्याचे कृत्तीतून केली जात होती. त्यामुळेच राज्यपाल भवन भाजप भवन झालं होतं अशी बोचरी टीकाही पटोले यांनी केली आहे.

राज्यासाठी आणि देशासाठी ज्यांनी प्रचंड मोठं काम केले आहे. ते महापुरुष राज्याला नेहमीच आदर्श राहिले आहेत. आणि महाराष्ट्रातील विचारवंताना मोठे आदराचे स्थान आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून अनेकदा महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केली गेली आहेत तयामुळेच त्यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करून त्यांना पाठवा अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.