AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेश नाईक यांना न्यायालयाचा दिलासा, काय आहे महिलेचं प्रकरण?

गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्याच परिचयाच्या एका महिलेने रिव्हाल्व्हर दाखवत धमकी देणे आणि बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल केले होते.

गणेश नाईक यांना न्यायालयाचा दिलासा, काय आहे महिलेचं प्रकरण?
गणेश नाईक
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Dec 02, 2022 | 5:37 PM
Share

मुंबई – नवी मुंबईचे भाजपा  नेते गणेश नाईक यांना  मुंबई उच्च न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. नाईक यांच्या  विरोधातला नवी मुंबईतील दोन गुन्हे  प्रकरणं तीन महिन्यांत निकाली काढण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने  संबंधित दंडाधिकारी न्यायालयाला  निर्देश दिली होते. आता त्यांची  याचिका निकाली काढली आहे. गणेश नाईक यांच्या  विरोधात लिव्ह इनमध्ये  राहणा-या एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले होते.  त्यात पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगत  नवी मुंबई पोलिसांनी  या प्रकरणी ‘ए समरी’ रिपोर्ट कोर्टात सादर केली आहे. त्याचबरोबर नाईक यांच्या विरोधात  राजकीय वैमनश्यातून तक्रार  दाखल झाल्याचा  गणेश नाईक  यांच्या वतीने दावा करण्यात आला. हा  दावा मुंबई  उच्च न्यायालयानं ग्राह्य धरला आहे.

गणेश नाईक यांच्या विरोधात  त्यांच्याच परिचयाच्या एका महिलेने रिव्हाल्व्हर दाखवत धमकी देणे आणि बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल केले होते. मात्र या दोन्ही गुन्ह्यात मुंबई हायकोर्टाने गणेश नाईक यांना दिलासा देत त्यांची याचिका निकाली काढली आहे.

एवढंच नव्हे तर गणेश नाईक यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्हया बाबतचे खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दंडाधिकारी कोर्टाला दिले.

पोलिसांनी या प्रकरणात ए समरी रिपोर्ट दाखल केली. ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात आली असल्याचा दावा गणेश नाईक यांचे वकील अशोक मुंडरगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

मुंबई उच्च न्यायालयात  न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर गणेश नाईकांनी गुन्हा रद्द करण्यासाठी  केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

सध्या भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्या परिचयाची  एका महिलेने बलात्कार आणि नंतर  धमकावल्याचे तक्रार केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

तक्रारदार महिला आणि गणेश नाईक हे दोघेही वर्ष  1995 ते 2017 पर्यंत लिव्ह इन रिलेशन मध्ये  होते.  त्यामुळे प्रथम दर्शनी याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने  गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला होता.

Follow Us
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?