AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, देवेंद्र फडणवीसांनी आपला ‘पण’ सांगितला…

इंग्लंडमधील तलवार आपल्यासाठी महत्वाची आहे त्याचप्रमाणे आमच्या उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेली तलवारही आमच्यासाठी महत्वाची आहे.

इंग्लंडमध्ये असलेली तलवार आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारच, देवेंद्र फडणवीसांनी आपला 'पण' सांगितला...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Nov 10, 2022 | 9:15 PM
Share

मुंबईः सध्याच्या काळातील राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारही वेगवेगळ्या निर्णय घेत सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींनाही वेगळे वलय प्राप्त करुन देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने नुकतेच प्रतापगडावरील अफजल खान कबरीलजवळील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे सर्वस्तरातून कौतूकही होऊ लागले.

एकीकडे या घटना चालू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, इंग्लंडमध्ये असलेली छत्रपती तलवार आणण्यासाठी आपण प्रयत्न करणारच असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

या तलवारीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार हे सांस्कृतिक मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्या प्रमाणे इंग्लंडमधील तलवार आपल्यासाठी महत्वाची आहे त्याचप्रमाणे आमच्या उदयनराजे भोसले यांच्याकडे असलेली तलवारही आमच्यासाठी महत्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

तलावारीबद्दल बोलताना त्यांनी हेही सांगितले की, ज्यांनी कुणी हे घेऊन गेले आहेत, ते आपण पाहिलं पाहिजे. आणि जे-जे आपल्याकडून घेऊन गेले आहेत ते आपण आणलं पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आरोप केले होते, त्ंयाविषयी बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्याची सवय असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामुळे त्यांनी टीका करण्याऐवजी मला असं वाटतं की कधीतरी त्यांनी आपल्या अंतर्मनात शिरून पाहिले पाहिजे म्हणजे त्यांना त्याचे उत्तर मिळेल असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी आपल्या तुरुंगवासाची तुलना लोकमान्य टिळक आणि सावरकर यांच्याशी केलेली आहे, त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, यावर मी फक्त स्मितहास्य देईन.

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, आम्ही पहिल्यापासून असंच म्हणतो आहे की, महाराष्ट्रात कोणतीही यात्रा आली तरी तिला संरक्षण देण्याची जबाबदारी ही आमची आहे.

त्यामुळे त्याविषयी आताच जास्त काही न बोलता प्रतिसादाबद्दल यात्रा संपल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी भारत जोडो यात्रेबद्दल सांगितले.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......