.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022 : मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे, राज्यसभेतल्या विजयी सभेत फडणवीसांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने आपल्याला कौल दिला होता. मात्र तुम्ही पाठीत खंजीर खुपसून बेईमानी केली. आता किमान ही सत्ता तरी नीट चालवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.

Rajya Sabha Election 2022 : मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे, राज्यसभेतल्या विजयी सभेत फडणवीसांच्या टार्गेटवर पुन्हा उद्धव ठाकरे
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 11, 2022 | 2:05 PM
Share

मुंबई : या निवडणुकीनंतर या सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे. आम्ही जिंकलो, ते हरले इथपर्यंत विषय सिमित नाही. मात्र महाराष्ट्राचा विकास थांबला आहे, असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. त्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीवर आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की केवळ आमच्याशी लढायचे म्हणून आमच्या काळातील प्रकल्प बंद केले. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून महाराष्ट्राचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी जीएसटी, पेट्रोल-डिझेल यावरूनही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

‘विमा कंपन्यांनाच फायदा’

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला. मात्र त्याबद्दल हे सरकार बोलायला तयार नाही. आमच्या काळामध्ये भरलेल्या विम्यापेक्षा जास्त पैसे मिळाले तरीही हे लोक विमा कंपन्यांवर मोर्चे काढत होते. आज मात्र सगळे त्यांच्या घशात चालले आहे. यावर कोणीही बोलत नाही. शेतकऱ्याला मदत नाही. शेतमाल खरेदीची अवस्थआ वाईट आहे. वीजेचा तुटवडा, भारनियमन, प्रकल्प बंद यामुळे महाराष्ट्र मागे चालला आहे, अशी टीका त्यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘किमान ही सत्ता तरी नीट चालवा’

बेईमानी करून राज्य घेतले असले तरी राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यासारखे वागले पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचे घर पाड, त्याचे घर पाड. मी नशीबवान आहे, माझे मुंबईत घरच नाही. त्यांना सरकारी बंगल्यालाच नोटीस द्यावी लागेल, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. केवळ पदांकरता सरकार चालवायचे आणि आणि समाजातील एकाही घटकाचा विचार करायचा नाही, ही अवस्था अत्यंत खराब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने आपल्याला कौल दिला होता. मात्र तुम्ही पाठीत खंजीर खुपसून बेईमानी केली. आता किमान ही सत्ता तरी नीट चालवा. किमान दोन काम तरी व्यवस्थित करा, असे आव्हान त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले.

Follow Us
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय