AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Temperature | मुंबईत मोठे वातावरणीय बदल, 27 वर्षात तापमान 2 अंशांनी वाढलं

एका अभ्यासामध्ये तर मागील 27 वर्षात मुंबईचे तापमान चक्क दोन अंशांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे मुंबईतील वातावरणीय बदलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

Mumbai Temperature | मुंबईत मोठे वातावरणीय बदल, 27 वर्षात तापमान 2 अंशांनी वाढलं
mumbai temperature
| Edited By: | Updated on: Oct 20, 2021 | 12:00 AM
Share

मुंबई : आकाशात जाणाऱ्या इमारती, धूर ओकणाऱ्या गाड्या असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे. निसर्गाशी छेडछाड केल्यामुळे येथील वातावरण झपाट्याने बदलताना दिसत आहे. एका अभ्यासामध्ये तर मागील 27 वर्षात मुंबईचे तापमान चक्क दोन अंशांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे मुंबईतील वातावरणीय बदलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

मुंबईतील वातावरण बदलावर धक्कादायक निष्कर्ष

नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, हैदराबाद मधील उस्मानिया विद्यापीठ आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठातील संशोधकांनी एक अहवाल दिला आहे. या अहवालात मुंबईतील वातावरण बदलावर धक्कादायक निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. निष्कर्ष मांडण्यासाठी संशोधकांनी उपग्रहांची मदत घेतली आहे. त्यांनी मुंबई तसेच उपनगरांचा अभ्यास केलाय.

मुंबईचे सरासरी तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले

या अभ्यासामध्ये मुंबईने 1991 ते 2018 या काळात 40 टक्के जंगल आणि झुडपे असलेली जमीन, तब्बल 81 टक्के मोकळी जागा तसेच 30 टक्के जलक्षेत्र गमावल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे मुंबईतील वातावरणात मोठा बदल झालाय. फक्त सत्तावीस वर्षात मुंबईचे सरासरी तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. तशी माहिती या संशोधनात देण्यात आली आहे. या संशोधनात मुंबई तसेच उपनगरातील 603 चौरस किलोमिटरचा अभ्यास करण्यात आला आहे.

बांधकाम क्षेत्रात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ

मुंबईतील वातावरणीय बदल तसेच तापमानवाढीला फक्त हवामान बदल कारणीभूत नाहीये. तर अमर्याद वाढलेले बांधकामसुद्धा वातावरण बदलासाठी कारणीभूत ठरले आहे. 1991 ते 2018 या काळात मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्रात तब्बल 66 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इतर बातम्या :

ऊस परिषदेत राजू शेट्टींचा एल्गार, ऊस एफआरपीच्या मुद्द्यावरुन शरद पवार आणि भाजपवर हल्लाबोल

Amarinder Singh New Party | मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता

SSC HSC Board Supplementary Exam Result | इयत्ता दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचा बुधवारी निकाल

(due to construction and environment change in 27 years mumbai temperature increased by 2 degree celsius)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.