AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक येताच म्हणतात मुंबई खतरे में है… एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ येथील सभेत चांगले तोंडसुख घेतले.

निवडणूक येताच म्हणतात मुंबई खतरे में है... एकनाथ शिंदे यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
eknath shinde
| Updated on: Jan 12, 2026 | 11:38 PM
Share

महायुतीने शिवतीर्थ येथे सोमवारी रात्री मोठी सभा घेतली. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका करताना हे भाऊ स्वत:चे अस्तित्व संपण्याच्या भीतीने एकत्र आल्याचे सांगितले. आमची कोणाला उत्तर देण्यासाठी ही सभा घेतलेली नाही. आम्ही विकासाचे राजकारण करणारे आहोत असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पुढे म्हणाले की, शिवतिर्थाचं आणि शिवसेनेचं अतुट नातं आहे. महायुतीचं अतुट नातं आहे. समोरच बाळासाहेबांचं स्मृती स्थळ आहे. मागे ज्यांनी आपल्याला संविधान दिलं त्या बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे. बाजूला सावरकर स्मारक आहे. या तिन्ही महापुरुषांच्या साक्षीने सभा होत आहे. शिवतिर्थावरची ही प्रचार सभा नाही तर परिवर्तन आणि बदलाची नांदी आहे असेही शिंदे यावेली म्हणाले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की काल इथे एक सभा झाली. त्यात नेहमीच्याच शिव्याशाप, टोमणे टीका करून गेले. आता आम्हाला सवय झाली. तुम्हालाही झाली आहे. त्यांच्याकडे मुद्देच नाही. आपली सभा कुणालाही उत्तर देण्यासाठी नाही. तर साडेतीन वर्षात महायुतीने केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि पुढच्या पाच वर्षात आम्ही काय करणार आहे हे सांगण्यासाठी ही सबआ आहे. या आरोपांना मी कधी आरोपाने उत्तर दिलं. मी आरोपांना कामातून उत्तर दिलं आणि कामातूनच उत्तर देतो. आता भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण लोकांना अपेक्षित आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

… निवडणुका आल्यावर पॉलिटिक्स

आम्ही तेच केलं. तेच करणार. भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण. विकसित भारत हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. ते पूर्ण करत आहोत. ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानीसारखीच दिसली पाहिजे हे आम्ही ठरवलं आहे. बाळासाहेबांचे विचार आणि मोदींचं व्हिजन घेऊन आपण पुढे चाललो आहोत असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्ही मुंबईच्या विकासासाठी काम करत आहोत. यापुढेही फक्त विकास विकास आणि विकास हाच अजेंडा आहे. काही लोकांना निवडणूक आल्यावर मराठी माणसाची आठवण येते. एरव्ही ढुंकूनही पाहत नाही. त्यांना मराठीसाठी काही करावं असं वाटत नाही. दिवसभर नेटफिलिक्स आणि निवडणुका आल्यावर पॉलिटिक्स सुरू आहे असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...