AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांचा ‘आवाज’ खाली, मान वर, दिवाळीत ध्वनी प्रदूषण घटलं

सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दिवाळी दणक्यात साजरी होत आहे. मात्र, यंदा कानठळ्या बसविणारे फटाके न फुटल्याने मुंबईत गेल्या 15 वर्षातील सर्वात शांत (fireworks sound pollution decrease in diwali) दिवाळी साजरी झाली आहे.

मुंबईकरांचा 'आवाज' खाली, मान वर, दिवाळीत ध्वनी प्रदूषण घटलं
fireworks
| Edited By: | Updated on: Oct 29, 2019 | 9:19 PM
Share

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दिवाळी दणक्यात साजरी होत आहे. मात्र, यंदा कानठळ्या बसविणारे फटाके न फुटल्याने मुंबईत गेल्या 15 वर्षातील सर्वात शांत (fireworks sound pollution decrease in diwali) दिवाळी साजरी झाली आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधातील मोहिमेमुळेच यंदा मुंबईत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे फटाके फुटले (fireworks sound pollution decrease in diwali) नाही, असं आवाज फाऊंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु आहे. त्याला चांगलं यश मिळालं असून यंदा दिवाळीत ध्वनी प्रदूषणाची 112.3 डेसिबल इतकी नोंद झाली. रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानेही त्यावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येतं आहे. त्याआधी 2017च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची 117.8 डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती, असं आवाज फाउंडेशनने म्हटलं आहे.

“गेल्या 15 वर्षांपासून ‘आवाज’ फाऊंडेशन दिवाळीतील प्रदूषणाची नोंद ठेवत आहे. तेव्हापासून आतापर्यंतचा अनुभव पाहता यंदाची दिवाळी अत्यंत शांत आहे, असं म्हणावे लागेल. 2010 पर्यंत दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे आवाज असायचे. या फटाक्यांचा आवाज कधी कधी तर 145 डेसिबलपर्यंत जायचा”, असं सुमैरा यांनी सांगितले. त्यात लोकांनीही आपल्या लहानग्यांना हलके फुलके फटाके घेतलेत जे आवाज करत नाहीत. त्यामुळेही या ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे.

“यंदा आवाजाची पातळी 112.3 डेसिबल इतकी आहे. सुतळी बॉम्बसारख्या कानठळ्या बसविणारे फटाके यंदा कमी झाले आहे. यंदा फुलबाजा, सुरसुरी, चक्रीचाच दिवाळीत वापर करण्यात आला. त्याबद्दल मी मुंबईकरांना खास धन्यवाद देते. माझ्यासाठी तर ही हॅपी दिवाळीच आहे, म्हणूनच मला मुंबईकरांना पुन्हा एकदा धन्यवाद द्यावेसे वाटतात”, असंही त्यांनी सांगितलं.

“दुसरीकडे फटाके विक्रेते नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतात, तसेच यावर्षी कमी आवाजाचे फटाके दुकानात आलेत, ध्वनी प्रदूषण हे फक्त फटाक्यांमुळे होत नसून रस्तावर चालणाऱ्या गाड्याही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात, हेही बरोबर असल्याचे” सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले.

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.