AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी कुणाला मिळणार आमदारकी? शिंदे गटाची नावं तर फायनल, भाजप, राष्ट्रवादीत कुणाची वर्णी?

Governor Appointed MLA : अनेकांच्या आमदारकीच्या स्वप्नांना सध्या धुमारे फुटले आहे. राज्यपाल नामनिर्देशीत 12 जागांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या चार वर्षांपासून आमदारकीच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पण आता विधानसभेच्या तोंडावर ही नियुक्ती होण्याची चिन्ह दिसत आहेत. काय आहे अपडेट?

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मोर्चेबांधणी; विधानसभेपूर्वी कुणाला मिळणार आमदारकी? शिंदे गटाची नावं तर फायनल, भाजप, राष्ट्रवादीत कुणाची वर्णी?
विधानसभेपूर्वी महायुतीची मोठी खेळी
| Updated on: Oct 04, 2024 | 11:10 AM
Share

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांच्या नियुक्तीला मुहूर्त लागण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे अनेकांच्या स्वप्नांना पुन्हा धुमारे फुटले आहेत. या नियुक्ती करताना अर्थातच मर्जीतील कार्यकर्ता, पदाधिकारी, सामाजिक, जातीय समि‍करणांचा विचार होणार, काहींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार हे निश्चित आहे. विधानसभेच्या तोंडावरच 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त साधल्या जात असल्याने त्यातून काय संदेश सरकारला द्यायचा हे स्पष्ट आहे.

प्रलंबित आमदारकीला विधानसभेचा मुहूर्त

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा मुद्दा गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडला होता. महाविकास आघाडीने जून 2020 मध्ये 12 आमदारांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्याला काही हिरवा कंदिल दाखवला नाही. त्यांनी नियुक्त्या दिल्या नाहीत. कोश्यारी यांनी मुद्दामहून अडवनूक केल्याचा आरोप करत कोल्हापूर येथील सुनील मोदी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राज्यात जुलै 2022 मध्ये सत्ता परिवर्तन झाले. महायुतीचे सरकार आले. आधीच्या आमदारांची यादी बारगळली. आता विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा मुद्दा धसास लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शिंदे गटाने घेतली आघाडी

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी एकनाथ शिंदे गटाने महायुतीत आघाडी घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने त्यांच्या 5 इच्छुकांची नावे भाजप पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली आहे. यामध्ये अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकसभेला ज्यांना डावलण्यात आलं. ज्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यांच्या नावाला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून येते. तर ज्यांना महामंडळ देण्याचे आश्वासन देण्यात आले, त्यांची पण वर्णी लावण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक पण ज्यांना उमेदवारी देणे अडचणीचे आहे, त्यांची या आमदारकीवर बोळवण करण्यात येणार आहे.

शिंदे गटाने जी नावं पुढं केली आहेत, त्यात मनीषा कायंदे, रविंद्र पाठक, चंद्रकांत रघुवंशी, हेमंत पाटील आणि संजय मोरे या पाच जणांची नावं असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिकृतपणे अजून पक्षाने याविषयीची माहिती दिलेली नाही. लवकरच यासंबंधीचा निर्णय महायुतीमधील तीनही पक्ष जाहीर करू शकतात.

मग कुणाच्या पारड्यात सर्वाधिक जागा?

राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांसाठी सुद्धा रस्सीखेच सुरू आहे. या आमदारांमध्ये आपले सर्वाधिक आमदार असावेत यासाठी भाजप आग्रही असल्याचे समजते. भाजपने 6 जागांवर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 3-3 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.