Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचं विधान भांडणं लावण्याचं, व्यापाऱ्यांकडूनही राज्यपालांच्या त्या विधानाचं समर्थन नाही

हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण आलं.

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांचं विधान भांडणं लावण्याचं, व्यापाऱ्यांकडूनही राज्यपालांच्या त्या विधानाचं समर्थन नाही
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 3:13 PM

मुंबई : राज्यात आजपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या एवढी कोणत्याही राज्यपालांची चर्चा झाली नसेल, तसेच वादही झाले नसतील. महाविकास आघाडी सरकारच्या काळातला (Uddhav Thackeray) राज्यपाल विरुद्ध सरकार हा संघर्ष संबंध महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतचं राज्यपालांचे विधान आणि त्यानंतर भडकलेले राज ठाकरेही (Raj Thackeray) पाहिले आहेत. मात्र शुक्रवारी पुन्हा राज्यपालांनी एक मोठं विधान केलं आणि संतापाचा डोंब उसळला. मुंबईतून गुजरात आणि राजस्थानी काढले तर मुंबईत काहीच पैसा उरणार नाही. मुंबईला देशाच्या आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र हे लोक बाहेर गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपालांनी केलं. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपालांवर टीकेची झोड उडवली. त्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण आलं. मात्र याबाबत आता मुंबईतल्या व्यापाऱ्यांनीही राज्यपालांचे विधान हे केवळ भांडण लावण्याकरता आहे, असे म्हणत त्याला विरोध दर्शवला आहे.

राज्यपालांच्या विधानाला व्यापाऱ्यांचाही विरोध

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे, तर दुसरीकडे मुंबईतील गुजराती आणि राजस्थानी व्यापारी वर्तुळाने राज्यपालांच्या विधानाला विरोध केला आहे. बोरिवलीच्या राजस्थानी आणि गुजराती व्यापारी मंडळांनी राज्यपालांच्या विधानाला भांडणाचे विधान म्हटले आहे. मुंबईची आर्थिक राजधानी सर्वांच्या सहकार्याने बनली आहे, त्यामुळे कुणी बाहेर गेलं तर काही फरक पडेल, असे राज्यपालांचे विधान चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

राज्यपलांच्या विधानावर भाजपची भूमिका काय?

आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याच समर्थन करत नाही. ते त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते पण आम्ही याला समर्थन देऊ शकत नाही. अनेक हुतात्म्यांने बलिदानाने ही मुंबई उभी राहिलीय. आणि ही संपूर्ण भाजपची भूमिका आहे आमचे सगळेच नेते सांगत आहेत की हे समर्थनीय नाही. अशी प्रतिक्रिया यावर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

राज्यपलांविरोधात राज्यभर आंदोलनं

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या वक्तव्याने राज्यभर निषेध करण्यात येतो आहे. आज उस्मानाबाद येथे शिवसेना पदाधिकारी यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले यावेळी राज्यपाल यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच कोशारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली.
Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.