AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!

मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे.

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!
Iqbal singh Chahal
| Edited By: | Updated on: Jun 09, 2021 | 1:43 PM
Share

मुंबई: मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबल्याचं इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यानं काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असंही चहल यांनी म्हटलं आहे. (Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. साधारणपणे 24 तासात 165 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. परंतु, मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात 155 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबली, असं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं.

फक्त तीन पॉइंटवरच वाहतूक कोंडी

मुंबईत दहिसर सबवे, सायन रेल्वे ट्रॅक आणि चुनाभट्टी ट्रॅक हे तीन पॉईंट वगळता मुंबईत कुठेही रोड आणि लोकल वाहतूक बाधित झाली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच मोगरा पंपिंग स्टेशन झाल्याशिवाय अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबण्याचा प्रश्न सुटणार नाही. पालिकेने टेंडर काढले आहे. त्यामुळे दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. मात्र, पावसाळ्यात या सबवेमध्ये लोक अडकून पडू नये म्हणून हा सबवे संपूर्ण पावसाळा बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी नाही

हिंदमातामध्ये गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. हिंदमाता येथे आपण काम केल्याने अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. साडेतीन फूट पाणी साचले तरी हिंदमातामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. केंद्र सरकारने दहा दिवसांपूर्वीच अंडरग्राऊंड पाईप टाकण्यासाठी पालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे टाटा मिल्स आणि रेल्वेच्या खालून दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदमाताचा पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. हा 140 कोटी रुपयांचा भूमिगत प्रकल्प आहे, असं त्यांनी सांगितलं. (Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

संबंधित बातम्या:

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर

सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, पालिकेत 5 वर्षात 1 हजार कोटींचा घोटाळा; शेलारांचा आरोप

Mumbai Rains Live: पाणी साचणार नाही असा दावा केला नव्हता, काही नाले समुद्राच्या खाली असल्यानं पाणी साचणार: किशोरी पेडणेकर

(Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....