Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!

मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे.

Mumbai Rains : म्हणून मुंबई तुंबणारच, महापालिका आयुक्त चहल यांनी कारण सांगितलं!
Iqbal singh Chahal
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 1:43 PM

मुंबई: मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई का तुंबली? यावर महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबल्याचं इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्याकडे ड्रेनेजची कॅरिंग कॅपॅसिटी कमी असल्यानं काही तासांसाठी मुंबईत पाणी तुंबणारच, असंही चहल यांनी म्हटलं आहे. (Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधत ही माहिती दिली. साधारणपणे 24 तासात 165 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते. परंतु, मुंबईत आतापर्यंत 140 ते 160 मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात 60 मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात 155 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबई तुंबली, असं इकबाल सिंह चहल यांनी सांगितलं.

फक्त तीन पॉइंटवरच वाहतूक कोंडी

मुंबईत दहिसर सबवे, सायन रेल्वे ट्रॅक आणि चुनाभट्टी ट्रॅक हे तीन पॉईंट वगळता मुंबईत कुठेही रोड आणि लोकल वाहतूक बाधित झाली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच मोगरा पंपिंग स्टेशन झाल्याशिवाय अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबण्याचा प्रश्न सुटणार नाही. पालिकेने टेंडर काढले आहे. त्यामुळे दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. मात्र, पावसाळ्यात या सबवेमध्ये लोक अडकून पडू नये म्हणून हा सबवे संपूर्ण पावसाळा बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी नाही

हिंदमातामध्ये गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच वाहतूक कोंडी झाली नाही. हिंदमाता येथे आपण काम केल्याने अडीच फुटापर्यंत पाणी साचूनही वाहतूक कोंडी झाली नाही. साडेतीन फूट पाणी साचले तरी हिंदमातामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही. केंद्र सरकारने दहा दिवसांपूर्वीच अंडरग्राऊंड पाईप टाकण्यासाठी पालिकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे टाटा मिल्स आणि रेल्वेच्या खालून दीड किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे हिंदमाताचा पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. हा 140 कोटी रुपयांचा भूमिगत प्रकल्प आहे, असं त्यांनी सांगितलं. (Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

संबंधित बातम्या:

Mumbai Rains : मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला नाही, करणारही नाही : महापौर किशोरी पेडणेकर

सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, पालिकेत 5 वर्षात 1 हजार कोटींचा घोटाळा; शेलारांचा आरोप

Mumbai Rains Live: पाणी साचणार नाही असा दावा केला नव्हता, काही नाले समुद्राच्या खाली असल्यानं पाणी साचणार: किशोरी पेडणेकर

(Heavy rains cause waterlogging in Mumbai says iqbal singh chahal)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.