AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांमुळेच भाजप गावागावात पोहोचला; संजय राऊतांचा टोला

बाळासाहेबांनी त्या वेळी भाजपसोबत युती केली नसती तर भाजप गावपातळीपर्यंत पोहोचला नसता," असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. (Balasaheb Thackeray Sanjay Raut)

बाळासाहेबांमुळेच भाजप गावागावात पोहोचला; संजय राऊतांचा टोला
संजय राऊत
| Updated on: Jan 23, 2021 | 11:22 AM
Share

मुंबई : “भाजपचा राज्यभर झालेला विस्तार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे. भाजपला गावागावात पोहोचवण्यात बाळासाहेबांचा मोठा वाटा आहे. बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली नसती तर भाजप गावपातळीपर्यंत पोहोचला नसता,” असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. आज (23 जानेवारी) बाळासाहेब ठाकरे यांची 95 वी जयंती आहे. यानिमित्त ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना स्थानिक पक्ष स्थापन करुन राजकारण करण्याची सुरुवातही बाळासाहेब ठाकरे यांनीच केल्याचंही ते म्हणाले.

“महाराष्ट्रात यापूर्वी भाजपचे अस्तित्व नव्हते. युती केल्यानंतर शिवसेनेसोबत भाजपचाही प्रचार झाला. त्यामुळे भाजप गावागावात पोहोचला. बाळासाहेबांनी युती केली नसती तर आज भाजप ग्रमीण भागापर्यंत वाढला नसता,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच हे सत्य भाजपचे नेतेही स्वीकारतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठी माणूस त्यांचे स्मरण करत राहील

यावेळी त्यांनी शिवसेनेचा उगम, बाळासाहेबांचा मराठी माणसांसाठीचा लढा, यावर प्रकाश टाकला. बाळासाहेब ठाकरे शतकातून एकदाच घडतात. आज हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली आहे, त्याचे श्रेय बाळासाहेबांनाच जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ दिलं. त्यांनी मराठी माणसाला प्रेरणा दिली. त्यांच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे, असे राऊत म्हणाले. तसचे बाळासाहेबांच्या या कामामुळे राज्यातील मराठी माणूस त्यांचे कायम स्मरण करत राहील असेही ते म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात…

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असं वक्तव्य केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

Balasaheb Thackeray Statue | बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, राज-उद्धव एकाच व्यासपीठावर

 मराठी माणूस ते हिंदुत्व, शिवसेना आणि बाळासाहेबांमध्ये काय काय बदललं?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.