AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या हिताचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, सोलर विजेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल. सोलर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार तयार आहेत.

शेतकऱ्यांच्या हिताचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, सोलर विजेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 19, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांसाठीचा महत्वाचा निर्णय आज जाहीर केला. फडणवीस म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. सरकारनं फीडर सोलरायझेशनचा निर्णय घेतला. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे. याकरिता कृषीच्या फीडरचे सोलरायझेशन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपली जमीन तीस वर्षांच्या भाड्यावर द्यावी. एकरी ५० हजार रुपये म्हणजे हेक्टरी सव्वा लाख रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीस वर्षांनंतर शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळेल. दरवर्षी यामध्ये तीन टक्यांची वाढ होईल.

फीडरच्या पाच किलोमीटरच्या भागातील कुठलीही खासगी जमीन सोलर ऊर्जेसाठी घेण्यात येणार आहे. सरकारी जमीन ही पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील घेण्यात येणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज सात रुपयांची

ते म्हणाले, या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता होईल. सोलर लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार तयार आहेत. शेतकऱ्याला देण्यात येणारी वीज ही सात रुपयांची पडते. शेतकऱ्यांकडून दीड रुपया वसूल केला जातो. बाकीची शेतकऱ्याला सबसिडी दिली जाते.

सोलर वीज तीन रुपयांत मिळणार

सोलरची वीज ही तीन रुपयांपासून तीन रुपये वीस पैसेपर्यंत मिळणार आहे. यामुळे सबसिडीत घट होणार आहे. यामुळे कोळशाचा वापर कमी होईल. त्यामुळे होणारे नुकसान कमी होईल. देशात असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचं त्यांनी म्हंटलं.

यामुळे दिवसा विजेची मागणी पूर्ण होईल

राळेगणसिद्धीला फीडर करण्यात आले होते. ते व्यवस्थित सुरू आहे. त्यानंतर जवळपास ९०० मेगावॅटचे फीडर तयार केले आहेत. आता ८ हजार मेगावॅटच्या फीडरचे सोलरायझेशन करायचे आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवसा विजेची मागणी पूर्ण करता येईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

दिव्यांगांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले. केंद्राप्रमाणे काही निकष बदलवणे गरजेचे होते. ते केले असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं.

साखर कारखान्यांबाबत निर्णय

साखर कारखान्याच्या प्रस्तावासंदर्भात उपसमिती तयार करण्यात आली आहे. त्यासोबत काही तत्व तयार करायला सांगितले आहे. एखाद्या कारखान्याला कर्ज घ्यायचं असेल तर असेट व्हॅल्यूच्या किती रक्कम कर्ज घेता येते याचा नियम रिझर्व्ह बँकेने काढला आहे.

Follow Us
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी..
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मोठा धक्का! 92 लाख महिलांचा हप्ता बंद; सरकारची मोठी छाननी
जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
Jejuri Vari Accident | भंडाऱ्याच्या उत्साहात काळाचा घाला! जेजुरीत भरधाव टेम्पोने वारकऱ्यांनाच चिरडलं, आकडा आला समोर
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
मुंबईत संतापजनक घटना! चिमुकलीवर वॉचमनकडून अत्याचार, नराधम अटकेत
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवरच उगारला चाकू, पुढे...
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट...
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
Beed | पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना; शेतकरी हवालदिल
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
Buldhana | बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! सह्याद्री-अजिंठा पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी
NCP Banner | शरद पवारांचे फोटो पुन्हा राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकणार? परवानगी अन्... राजकीय चर्चांना उधाण
आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये....
Shrirampur Crime Case | आधी मकोका, मगच अंत्यसंस्कार! युवकाच्या मृत्यूनंतर श्रीरामपूरमध्ये मृतदेहासह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन