AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत उन्हाचा ताप वाढला, पंखे, कुलर आणि एसीचा वापर वाढल्याने वीजेच्या मागणीत वाढ

मुंबईतील तापमानात गेल्या काही दिवसात मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सांताक्रुझ वेध शाळेतील नोंदणीनुसार मुंबईचे तापमान 38.7 अंश नोंदले गेले आहे. त्यामुळे वीजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे.

मुंबईत उन्हाचा ताप वाढला, पंखे, कुलर आणि एसीचा वापर वाढल्याने वीजेच्या मागणीत वाढ
temperature increases in mumbaiImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Mar 21, 2024 | 10:16 PM
Share

मुंबईत गेले काही दिवस उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच ही अवस्था तर पुढे एप्रिल आणि मे महिन्यात होणार काय ? याविषयी चिंता लागून राहीली आहे. यंदाचा उन्हाळा जास्त कडक असणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मार्च महिन्यातच राज्यातील अनेक नदी आणि धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पाणी टंचाई सुरु झाली आहे. मुंबईतील तापमान प्रचंड वाढल्याने घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे. मुंबईचा पारा 38.7 सेल्सिअस अंशावर पोहचले आहे. सांताक्रुझ वेधशाळेने बुधवारी 38.7 अंश तापमान नोंदविल्याने या वर्षातील आतापर्यंत हे सर्वात जास्त तापमान आहे. तापमानात वाढ झाल्याने वीज वापर वाढला असल्याने वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

मुंबईतील सांताक्रुझ वेधशाळेने बुधवारी दिवसाचे तापमान 38.7 अंश नोंदले आहे. या वर्षातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान नोंद झाले आहे. गेल्या वर्षी सांताक्रूझ वेधशाळेने 13 मार्च रोजी दिवसाचे कमाल तापमान 39.4 अंश नोंदवले होते. तर बुधवारी कुलाबा वेधशाळेने दिवसाचे तापमान 34.3 अंश नोंदवले असून ते सामान्यपेक्षा तीन अंशांनी जास्त आहे. मुंबईत 28 मार्च 1956 रोजी मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान 41.7 अंश इतके नोंद झाले होते. तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना उष्णतेच्या लाटांची झळ सहन करावी लागत आहे. मुंबईकरांना टळटळीत उन्हात बाहेर पडू नये. विषेशत: आजारी तसेच ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांनी उन्हात जास्त फिरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

तापमान वाढल्याने वीजेच्या मागणीत वाढ

एकीकडे मुंबईतील तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे वीजेची मागणी वाढत चालली आहे. मुंबईतील वीजेच्या मागणीत गेल्याकाही दिवसात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईतील वीजेची कमाल मागणी 3 हजार मेगावॅटच्यावर गेली आहे. तर बुधवारी राज्यभरात वीजेची सर्वाधिक मागणी 27 हजार मेगावॅटच्या जवळपास होती. मुंबई आणि उर्वरित राज्यभरातील सुमारे 3.5 कोटी ग्राहकांना पुरवठ्यात कोणतीही कमतरता भासू नये यासाठी वीज खरेदी करार करण्यात येणार आहेत. ज्यात मुंबई शहर आणि उपनगरातील सुमारे 50 लाख वीज वापरकर्त्यांचा समावेश आहे. उष्णतेच्या लाटेच्या शक्यतेमुळे मुंबईतील सर्वाधिक मागणी 3 हजार 300 मेगावॅटवरून या उन्हाळ्यात 4 हजार मेगावॅटच्यावर वीजेची मागणी जाऊ शकते. गेल्यावर्षी मुंबई आणि उर्वरित राज्याची मिळून 30 हजार मेगावॅटपेक्षा जास्त विजेची एकत्रित कमाल मागणी होती. ही वीजेची मागणी बेस्ट, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि महावितरणने पूर्ण केली होती.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा