AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये तणाव, दोन गटांत तुंबड हाणामारी, पाच जखमी

kalyan crime news: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरु असताना कल्याणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये दोन गटांत तुंबड हाणामारी झाली. त्यात पाच जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कल्याणमध्ये तणाव, दोन गटांत तुंबड हाणामारी, पाच जखमी
क्राईम न्यूज
| Updated on: Nov 01, 2024 | 1:16 PM
Share

kalyan crime news: दिवाळीचा उत्सव सुरु असताना कल्याण पूर्वेमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. कल्याण पूर्वेतील कचोरे गावात फटाक्याच्या किरकोळ वादावरून हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून भर रस्त्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टिळक नगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यातच दिवाळी सणही आला आहे. यामुळे पोलिसांकडून सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे. परंतु कल्याणपूर्व भागात फटके फोडण्यावरुन वाद झाला. त्या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत परिस्थितीवर नियंत्रण आणले. सध्या कल्यामधील कचोरे गावात तणावपूर्ण शांतता आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काय घडली घटना

कल्याण पूर्व येथील कचोरे गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास फटाक्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. त्यावेळी काही काळ बाचावाची झाली. त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. या वादात भर चौकात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात पाच जण जखमी झाले आहेत. हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.