AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात घरावर दरड कोसळली, वडील आणि मुलाचा मृत्यू, एकजण जखमी

ठाण्यात डोंगराचा काही भाग कोसळ्याने एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना काल (29 जुलै) रात्री 12.20 च्या दरम्यान घडली.

ठाण्यात घरावर दरड कोसळली, वडील आणि मुलाचा मृत्यू, एकजण जखमी
| Edited By: | Updated on: Jul 30, 2019 | 8:32 AM
Share

मुंबई : ठाण्यात घरावर दरड कोसळ्याने एकाच घरातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही घटना काल (29 जुलै) रात्री 12.20 च्या दरम्यान घडली. घरावर डोंगराचा काही भाग कोसळ्याने या ढिगाऱ्याखाली तीन जण अडकले होते.

ठाण्यातील कळवा येथे ज्ञान गंगा शाळेजवळील आदर्श चाळीजवळील डोंगराचा भाग तेथील जवळच्या घरावर पडला. या ढिगाऱ्याखालील तीन जण अडकले होते. बचावकार्य़ पथकाने त्यांना बाहेर काढत नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान दोघांना मृत घोषित केले.

या घटनेत वडील आणि मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहे. बीरेंद्रे गौतम जैसवार (40), सनी जैसवार (10), अशी मृत झालेल्यांची नावं आहेत. तसेच निलम जैस्वार (35) यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे.

डोंगराचा भाग कोसळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या येथे 20 कुटुंबातील 70 रहिवाशांना जवळच्या ज्ञान गंगा शाळेमध्ये हलवण्यात आलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.