AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमचा जन्मच मांसाहारासाठी झालाय : जितेंद्र आव्हाड

"आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला आहे. देशातील 90 टक्के लोक मांसाहार खाल्याशिवाय जीवंत राहू शकत नाहीत, असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya) म्हणाले.

आमचा जन्मच मांसाहारासाठी झालाय : जितेंद्र आव्हाड
| Edited By: | Updated on: Feb 01, 2020 | 11:55 PM
Share

ठाणे : “आमचा जन्मच मांसाहार खाण्यासाठी झाला आहे. देशातील 90 टक्के लोक मांसाहार खाल्ल्याशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. तरीही गोहत्याबंदीच्या नावाखाली हे सरकार आमच्या खाण्याच्या अधिकारावर गदा आणत आहे”, अशी टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली (Maharashtra Housing Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya). ठाण्यात आज (1 फेब्रुवारी) नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात मूकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आंदोलकांना संबोधित करत असताना जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली (Maharashtra Housing Minister Jitendra Awhad slams BJP leader Kirit Somaiya).

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी काल (31 जानेवारी) शहापूर येथील एका आदिवासी कुटुंबासोबत भोजन केलं होतं. याबाबत आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर केले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर टीका केली होती. “आदिवासी कुटुंबासोबत शरद पवार मांसाहर खात आहेत आणि सोबत बिसलेरीचं पाणी पीत आहेत”, असा टोला त्यांनी लगावला होता. यालाच जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं.

“किरीट सोमय्या यांनी लिहून पाठवलं आहे की, गरीब आदिवासीच्या घरी गेला आणि चिकन खाऊन आला. गरीब आदिवासीदेखील चिकनच खातो कारण तेच आमचं खाद्य आहे. या देशातील 90 टक्के नागरिक मांसाहारशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. उद्या हे मोदी-शाह फापडा, जिलेबी आणि ढोकळा देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून जाहीर करायला मागे पुढे पाहणार नाहीत”, असा टोला आव्हाड यांनी भाजप नेत्यांना लगावला. “याशिवाय कोणताही मुस्लीम बांधव गायीचं मांस खात नाही”, असा दावा आव्हाड यांनी केला.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.