AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारांचे पुन्हा काय झाडी, काय डोंगर…सत्तेच्या दाव्यापूर्वीच महाविकास आघाडीने अगोदरच टाकला डाव, मग अपक्षांचे काय?

Maharashatra Vidhansabha Election 2024 Hotel Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची निकालाची घंटा वाजण्यापूर्वी घडामोडींना वेग आला आहे. बहुमत न मिळाल्यास ऐनवेळी हताशी असावेत म्हणून अपक्ष, बंडखोरांना चुचकारण्यात येत आहे. सत्तेच्या दाव्यापूर्वी फाटाफूट टाळण्यासाठी अजून एक डाव टाकण्यात आला आहे.

आमदारांचे पुन्हा काय झाडी, काय डोंगर...सत्तेच्या दाव्यापूर्वीच महाविकास आघाडीने अगोदरच टाकला डाव, मग अपक्षांचे काय?
काय झाडी, काय डोंगर
| Updated on: Nov 22, 2024 | 12:20 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर म्हणजे उद्या लागेल. एक्झिट पोलवर कुणाचा भरवसा नसल्याचे एकंदरीत राजकीय गोळाबेरजेवरून लक्षात येत आहे. महाविकास आघाडी, महायुतीपेक्षा अधिक सतर्क असल्याचे दिसले. दोन्ही गट आमदारांची मोट बांधून आहेत. त्यात फाटाफूट होऊ नये यासाठी ते सतर्क झाले आहेत. भाजपाने सर्वच आमदारांना सोबत ठेवण्याची कसरत सुरू केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने पण सर्व आमदारांना घेऊन राज्य बाहेर जाण्याची योजना आखल्याचे समोर येत आहे.

गुरुवारी संजय राऊत आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची बैठक झाली. जर महाविकास आघाडी आणि महायुतीत टफ फाईट झाल्यास सत्ता स्थापनेसाठी दोन्ही गट प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी अपक्ष, बंडखोरांना लोणी लावण्यात येत आहे. त्यांची मोट बांधण्यात येत आहे. तर दुसरीकडे स्वतःचे विजयी आमदार सांभाळण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे

या बैठकीनुसार, या आमदारांना काँग्रेस शासित राज्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. एका माहितीनुसार या आमदारांना कर्नाटक वा तेलंगणा येथे नेण्यात येईल. या आमदारांना शनिवारीच इतर राज्यात पाठवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. म्हणजे विजयाचा गुलाल उधळला की हे आमदार इतर राज्यात रवाना होतील. यामध्ये किती अपक्ष आणि बंडखोर असतील हे निकालानंतरच समोर येईल. त्यांची पण बाहेरच्या राज्यात बडदास्त ठेवण्यात येईल हे वेगळं सांगायला नको.

आमदार कधी येणार परत

बहुमताची गोळाबेरीज करताना महायुतीकडे किती आमदार आहेत हे पाहण्यात येईल. त्यांच्याकडे बहुमताचा आकडा नसल्यास महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. त्यापूर्वी अर्थातच सर्व आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणि इतर सोपास्कार करण्यात येईल. त्यानंतर या आमदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले तेव्हा शिवसेनेच्या आमदारांना अगोदर सुरत मग गुवाहाटी आणि गोव्यातून महाराष्ट्रात आणण्यात आले होते. तसाच काहीसा प्रकार आता होणार आहे. एक्झिट पोलवर महाविकास आघाडीला भरवसा नाही. संजय राऊत यांनी सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.

Follow Us
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.