AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : महाराष्ट्रात काय, मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टरची जादू नाहीच; मराठा आरक्षणाचं काय होणार?

Manoj Jarange Factor : मराठवाड्यातील निवडणुकीचा कौल पाहता, महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केल्याचे दिसून येते. लाडकी बहीण, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यांनी हिंदू एकवटल्याचे दिसते. राज्यातच नाही तर मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवर गणित जुळवता आले.

Manoj Jarange : महाराष्ट्रात काय, मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टरची जादू नाहीच; मराठा आरक्षणाचं काय होणार?
मनोज जरांगे फॅक्टर
| Updated on: Nov 23, 2024 | 11:36 AM
Share

राज्यातच नाही मराठवाड्यामधील निवडणुकीचा कौल पाहता, महायुतीच्या पारड्यात मतदारांनी भरभरून मतदान केल्याचे दिसले. आतापर्यंतची जी आकडेवारी समोर आली ती महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाल्याचे दिसून येते. लाडकी बहीण, एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यांनी हिंदू एकवटल्याचे दिसते. राज्यातच नाही तर मराठवाड्यातही मनोज जरांगे फॅक्टर चालला नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवर गणित जुळवता आले. थोड्याच वेळात चित्र स्पष्ट होईल. पण सध्याचा ट्रेंड हा महाविकास आघाडीच्या विरोधात असल्याचे दिसून आले.

महायुतीसह भाजपाची आघाडी

या कलामध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले. आता आलेल्या आकडेवारीनुसार 128 जागांवर भाजपा आघाडीवर दिसत आहे. तर 58 जागांवर शिंदे सेना पुढे आहे. मराठवाड्यात सुद्धा महाविकास आघाडीचे विजयाचे नगारे वाजत आहेत. मराठवाड्यातील 46 जागांपैकी 35 जागांवर महायुतीने मोठी बाजी मारल्याचे दिसते. तर महाविकास आघाडीला केवळ 10 जागांवर आघाडी असल्याचे समोर येत आहे. विदर्भातील 62 जागांपैकी 45 जागांवर महायुती तर 15 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे.

आता मराठा आरक्षणाचं काय होणार?

यापूर्वी मराठा आरक्षणाचा विषयाने राज्यात आक्रमक दिसला. लोकसभेत अनेक ठिकाणी महायुतीचे पानिपत झाले होते. त्यानंतर भाजपा, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनोज जरांगे पाटील यांची टीका सुरू होती. एकवेळ तर त्यांनी उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली होती. पण वेळेवर त्यांनी निवडणूक न लढवण्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी मराठ्यांनी कोणाला मतदान केले हे मला सांगता येणार नाही, असे वक्तव्य केले. निवडून येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराने बेईमान होऊ नये असे ते म्हणाले होते.

उपोषणासाठी तयार राहा

आता पुढील लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी काल केले. सरकार स्थापन झाले की आपण उपोषणाची घोषणा करणार असल्याचे ते म्हणाले. गावात कुठेही आमरण उपोषण करायचे नाही. तर अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करायचे असे त्यांनी सांगितले. मराठ्यांनी ज्यांना मतदान केले, त्यांनी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तर महायुतीमधील नेत्यांनी सरकार आले तर त्यांना उपोषण करण्याची गरज पडणार नाही असे वक्तव्य केले होते. एकंदरीत कल पाहता जरांगे फॅक्टर चालला नाही असेच चित्र दिसत आहे.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.