AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगेंना सरकारच… संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप; काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबत संजय राऊत यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केले आहेत. सरकारच जरांगेंना मुंबईत येण्यासाठी उकसवत असून, त्यांच्याशी चर्चा टाळत असल्याचं राऊत म्हणाले. यामुळे गणेशोत्सवादरम्यान मुंबईकरांना त्रास होईल, असं सांगतानाच सरकारचा अहंकार लोकशाहीला घातक असल्याचं राऊत यांनी नमूद केलं.

मनोज जरांगेंना सरकारच... संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप; काय म्हणाले?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2026 | 11:07 AM
Share

मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मुंबईत येत आहेत. सरकारने त्यांच्याशी चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे जरांगे यांच्यासमोर पर्याय नाही. म्हणूच ते मुंबईत येत आहेत. ते मुंबईत आले तर मुंबईकरांना मोठा त्रास होईल. मुंबईकरांना त्रास व्हावा ही जरांगेंची इच्छा नाही. पण सरकारच जरांगेंना मुंबईत येण्यासाठी उकसवत आहे, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे.

जरांगे मुंबईत आले तर मुंबईकरांना मोठा त्रास होईल. एक तर ज्या भागात त्यांचं आंदोलन आहे, त्या भागात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव असतो. जगभरातील पर्यटक त्याकाळात मुंबईत येतात. लालबागचा राजा, अदानीचा राजा आणि इतर मोठे गणपती याच भागात असतात. या सर्व गणपतींकडे लाखोंचे भक्त येतात. गणेशोत्सव डिस्टर्ब व्हावा, अशी जरांगेंची इच्छा वाटत नाही. माझं त्यांच्या लोकांशी बोलणं असतं. पण सरकार जरांगेंना मजबूर करत आहे. तुम्हाला यावंच लागेल. आम्ही तुमचं ऐकायलाच तयार नाही, असं सरकार म्हणत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दरवाजे बंद करून बसणं हे चांगल्या राज्यकर्त्यांचं लक्षण नाही. दरवाजे बंद करण्याची परंपरा मोदी आणि फडणवीसांनी आणली. गेल्या 10 वर्षापासून हेच सुरू आहे. हे चुकीचं आहे. जरांगे 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी सरकारने चर्चा करावी. चर्चेतून समाधान निघेल की नाही, माहीत नाही. कोणी सांगू शकत नाही. पण चर्चा केली पाहिजे, असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.

महाजनांना आव्हान

जरांगेंशी चर्चा झाली पाहिजे. ते नेते आहेत. समाज त्यांच्या पाठी आहे. गिरीश महाजन म्हणतात, शिव्या दिल्याने प्रश्न सुटत नाही. महाजनांचं म्हणणं बरोबर आहे. पण महाजन यांना जरांगेंशी चर्चा करण्याचा अधिकार दिला का? आधी महाजन यांनी याचा खुलासा करावा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

सर्वच अहंकारात

जरांगे समंजस नेते आहेत. पण जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्याशी चर्चा करून आहे तिथेच बैठक घेतली पाहिजे. सरकारला हे शक्य आहे. पण सर्व अहंकरात आहेत. कोणी मेला तरी काही फरक पडत नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहेत. लंडनमधील सरकार म्हणते, मला शिव्या घातल्या मी जरांगेंशी बोलणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

हे अमित शाहांचं पाप

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली. महाराष्ट्र जातीपातीत विभागण्याला अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जातीपातीत विखुरलेल्या समाजाला एकत्र आणलं होतं. त्यांना आधार दिला होता. पण सध्याच्या सरकारने वाट लावली आहे. महाराष्ट्र आज जे भोगत आहे. ते अमित शाह यांचं पाप आहे. यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र जातीपाती आणि पोटजातीत फाटला गेला, असा आरोपही त्यांनी केला.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?