AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी मागणी

गेल्या कित्येक वर्षांपासून गिरणी कामगार त्यांच्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी लढा देत आहेत. आज संजय राऊत यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या मागणी संदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी भूमिका जाहीर केली.

गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी मागणी
| Updated on: Jul 09, 2025 | 11:28 AM
Share

“उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय, गिरणी कामगारांना धारावी पूनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात. ज्या जागा तुम्ही, अदानीला दिल्या आहेत. त्यात गिरणी कामागारांना सुद्धा जागा मिळावी ही आमची मागणी आहे” अशी मोठी भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केली. “मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना, त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे. तसं नसेल तर मुंबईतले मोठे भूखंड अदानीला का देत आहोत” असा सवाल त्यांनी केला.

“धारावी संदर्भात आपण टीडीआर त्यांना दिला आहे. धारावीचा इतका मोठा भूखंड दिला आहे. याशिवाय मदर डेअरीपासून, दहीसर, मुलुंडेच टोल नाके मिठागर असे अनेक भूखंड त्यांना दिले आहेत. मुंबईचा गिरणी कामगार इथला भूमिपूत्र आहे. मराठी माणसू आहे. आमची मागणी कायम राहिलं. यांना मुंबईच्या बाहेर न टाकता, यांना धारावी पूर्नवसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे” असं संजय राऊत म्हणाले.

हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतय

“हा मराठी माणसाचा आवाज आहे. उद्धव ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहतील. तिथे मार्गदर्शन करतील. शिक्षकांचे प्रश्न आहेतच. हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतय. सरकार करतय काय हा गंभीर प्रश्न आहे. गिराणी कामगारांच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे गिरणी कामगाराच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

कॅन्टीन कर्मचाऱ्याला आमदाराकडून मारहाण

आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यावर संजय राऊत बोलले. “जर डाळ खराब असेल, तर त्याला जबाबदार कोण? याला तुमचं सरकार जबाबदार आहे. ही डाळ महाराष्ट्रात आदिवासी पाड्यांवर, गोरगरीबांच्या घरात मिळते. मोदी फुकटच धान्य वाटतायत, सगळ्यांनी त्या धान्याची क्वालिटी बघा” असं संजय राऊत म्हणाले.

ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत

“फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. टॉवेलवर जाऊन मारहाण करायची. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे. आमदाराने कोणाला मारहाण करायची, मग आपली बाजू मांडायची. मला डाळ, भात मिळाला नाही. मला असं वाटतं तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही मारहाण करण्याआधी विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता होता” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.