AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी मागणी

गेल्या कित्येक वर्षांपासून गिरणी कामगार त्यांच्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी लढा देत आहेत. आज संजय राऊत यांनी गिरणी कामगारांच्या घराच्या मागणी संदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी भूमिका जाहीर केली.

गिरणी कामगारांच्या घरांच्या मागणीसंदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी मागणी
| Updated on: Jul 09, 2025 | 11:28 AM
Share

“उद्धव ठाकरे यांनी जो प्रस्ताव दिलाय, गिरणी कामगारांना धारावी पूनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात. ज्या जागा तुम्ही, अदानीला दिल्या आहेत. त्यात गिरणी कामागारांना सुद्धा जागा मिळावी ही आमची मागणी आहे” अशी मोठी भूमिका खासदार संजय राऊत यांनी आज जाहीर केली. “मुंबईतल्या शिल्लक गिरणी कामगारांना, त्यांच्या कुटुंबियांना मुंबईतच आपण प्रस्थापित केलं पाहिजे. तसं नसेल तर मुंबईतले मोठे भूखंड अदानीला का देत आहोत” असा सवाल त्यांनी केला.

“धारावी संदर्भात आपण टीडीआर त्यांना दिला आहे. धारावीचा इतका मोठा भूखंड दिला आहे. याशिवाय मदर डेअरीपासून, दहीसर, मुलुंडेच टोल नाके मिठागर असे अनेक भूखंड त्यांना दिले आहेत. मुंबईचा गिरणी कामगार इथला भूमिपूत्र आहे. मराठी माणसू आहे. आमची मागणी कायम राहिलं. यांना मुंबईच्या बाहेर न टाकता, यांना धारावी पूर्नवसन प्रकल्पात सामावून घेतलं पाहिजे ही आमची मागणी आहे” असं संजय राऊत म्हणाले.

हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतय

“हा मराठी माणसाचा आवाज आहे. उद्धव ठाकरे या मोर्चाला उपस्थित राहतील. तिथे मार्गदर्शन करतील. शिक्षकांचे प्रश्न आहेतच. हे सरकार नक्की कोणते प्रश्न सोडवतय. सरकार करतय काय हा गंभीर प्रश्न आहे. गिराणी कामगारांच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे गिरणी कामगाराच्या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

कॅन्टीन कर्मचाऱ्याला आमदाराकडून मारहाण

आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यावर संजय राऊत बोलले. “जर डाळ खराब असेल, तर त्याला जबाबदार कोण? याला तुमचं सरकार जबाबदार आहे. ही डाळ महाराष्ट्रात आदिवासी पाड्यांवर, गोरगरीबांच्या घरात मिळते. मोदी फुकटच धान्य वाटतायत, सगळ्यांनी त्या धान्याची क्वालिटी बघा” असं संजय राऊत म्हणाले.

ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत

“फक्त आमदारांना 50 कोटी मिळालेत. ठेकेदारांना 50 कोटी मिळालेले नाहीत. कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार आहे. टॉवेलवर जाऊन मारहाण करायची. मी आज सीएमना टि्वटरच्या माध्यमातून कळवलय. ही आपल्या राज्यातील कायदा-सुव्यस्था आहे. आमदाराने कोणाला मारहाण करायची, मग आपली बाजू मांडायची. मला डाळ, भात मिळाला नाही. मला असं वाटतं तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही मारहाण करण्याआधी विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता होता” असं संजय राऊत म्हणाले.

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.