आधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक

गारगाई धरण बांधायचे असेल तर आधी बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करा त्यानंतरच धरणावर विचार होईल, असा पवित्रा शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी घेतला. (MLA Daulat Daroda on Gargai dam project)

आधी पालघरवासियांचे पुनर्वसन, नंतर मुंबईसाठी धरण, आमदार दौलत दरोडा आक्रमक
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 3:47 PM

ठाणे : गारगाई धरण बांधायचे असेल तर आधी बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करा त्यानंतरच धरणावर विचार होईल, असा पवित्रा शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांनी घेतला. शासकीय अधिकारी आणि बाधित गावांच्या प्रतिनिधींची वाडा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीत आमदार दरोडा यांनी धरणग्रस्त गावातील नागरिकांची भूमिका मांडली. तसेच गावाच्या प्रतिनिधींनीही शासकीय अधिकाऱ्यांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. (MLA Daulat Daroda on Gargai dam project)

मुंबई शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात नवे गारगाई धरण बांधण्याचे नियोजन आहे. या नव्या धरणामुळे मुंबईची पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर दुसरीकडे गारगाई धरणाची झळ अनेक गावांना बसणार असून अनेकांचं विस्थापन होणार आहे. अनेकांच्या शेतजमीनी आणि घरं धरणात जाणार आहेत. त्यामुळे बाधित गावांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वाडा येथील शासकीय विश्रामगृहात बाधित गावांचे प्रतिनिधी आणि मुंबई महापालिकेचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी आमदार दौलत दरोडादेखील उपस्थित होते. विस्थापितांचे पुनर्वसनाच्या बाबतीत समाधान झाल्याशिवाय धरणाचे काम सुरु करु नये, अशी सूचना त्यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. बाधितांच्या मागण्या मान्य करुनच धऱणाच्या कामाला सुरुवात करवी अशी भूमिकाही त्यांनी घेतली.

या बैठकीला धरणग्रस्त गावांचे प्रतिनिधी, आमदार दौलत दरोडा तसेच उपविभागीय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही

तिवरे धरणग्रस्तांची थट्टा, अधिकारी म्हणतात – वाहून गेलेल्या वस्तूंची बिलं आणा

तिवरे धरणफुटीमागील खरा ‘खेकडा’ कोण? चौकशी अहवाल 8 दिवसात सरकारच्या हाती

(MLA Daulat Daroda on Gargai dam project)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.