AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याचा मानस, किती वेळ वाचणार?

प्रवाशांचा हाच वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA)एक नवा प्लॅन आखला आहे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. या नव्या प्लॅननुसार ट्रान्स हार्बर लिंक रोड (Trance Harbour link Road) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याासाठी प्रयत्नशील आहे.

ट्रान्स हार्बर लिंक रोड मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याचा मानस, किती वेळ वाचणार?
मुंबई-पुणे प्रवास आणखी वेगवान होणार
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 21, 2022 | 6:18 PM
Share

मुंबई : सध्या मुंबई ते नवी मुंबई मार्गावरील ट्रॅफिकमुळे (Traffic) मुंबईहून पुण्याला जाताना एक्स्प्रेस (Mumbai Pune Express way) वेपर्यंत पोहचण्यास बराच वेळ जातो. त्यामुळे अनेक प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. शिवाय इंधनाचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याने त्याचा वेळेबरोबरच खिशालाही मोठा फटका बसतो. प्रवाशांचा हाच वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी एमएमआरडीएने (MMRDA)एक नवा प्लॅन आखला आहे. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. या नव्या प्लॅननुसार ट्रान्स हार्बर लिंक रोड (Trance Harbour link Road) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडण्याासाठी प्रयत्नशील आहे. प्राधिकरण यासाठी एक सल्लागार शोधत आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून निविदाही काढण्यात येणार आहेत. याबाबत प्राथमिक अहवालही तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासांना लवकरच मोठी गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे.

किती वेळ वाचणार?

या मार्ग जर या पद्धतीने जोडला गेला तर प्रवाशांना थेट मुंबईतील वरळी ते पुणे असा प्रवास करता येणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे. असा मार्ग जोडल्यास प्रवाशांचा साधारण एक तासापेक्षा जास्त वेळ वाचेल असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासाठी प्राधिकारणाला हजारो कोटींचा खर्च येणार आहे. त्याचाही विचार प्राधिकरण करत आहे. शिवडी ते नवी मुंबईच्या दिशेने या मार्गावार एकवीस किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पाचे काम 65 टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मुंबई-पुणे प्रवास सुसाट होणार

ट्रान्स हार्बर लिंक रोड आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जर थेट जोडले गेले तर हा मैलाचा मोठा दगड ठरणार आहे. कारण आता मुंबई ते नवी मुंबई प्रवासाठी गर्दीच्या वेळेला साधारणता दीड तास वाया जातोय. त्यामुळे पुढे पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुण्याकडून येणाऱ्या अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र याच मार्गवर हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आजच्या काळात शहरांचे स्वरुप मोठे होत आहे. रस्त्यावर वाहनांची सख्याही वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी ही एक अशी समस्या झाली आहे की जिचा सामना प्रत्येकाला कधी ना कधी करावा लागत आहे. त्यामुळे याच वाहतूक कोंडीतून सुटाका करण्याचा नवा प्लॅन एमएमआरडीए आखत आहे.

VIDEO: आधी अहवाल, नंतर नोटीस मगच कारवाई; राणेंच्या बंगल्यात पालिका अधिकाऱ्यांची दोन तास पाहणी

Kirit Somayya | ईडीकडे तक्रार कशी करायची असते? किरीट सोमय्यांनी घेतली राऊतांची शाळा!

मुलुंडमध्ये भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक! परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅरिकेट्स टाकले

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली