AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा “अकोले पॅटर्न”, लाभ कुणाला? प्लॅन काय? वाचा एका क्लिकवर

प्रख्यात शेतीतज्ज्ञ, 'ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, (OBC Indian Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे चेअरमन प्रा. काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता 'अकोले पॅटर्न' घेऊन आले आहेत.

शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा अकोले पॅटर्न, लाभ कुणाला? प्लॅन काय? वाचा एका क्लिकवर
काशिराम वंजारी यांंचा अकोले पॅटर्न
| Updated on: Feb 21, 2022 | 5:39 PM
Share

मुंबई : आपण शेतकऱ्याला (Farmer) जगाचा अन्नदाता तर म्हणतो. मात्र एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरी इतर अडचणी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी अडकल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितांना हादरे देणारा बहुजन महासंघाचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांचा ‘ अकोला पॅटर्न’ (Akola Pattern) एकेकाळी गाजला होता. त्यानंतर गेल्या 11 महिन्यात सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रख्यात शेतीतज्ज्ञ, ‘ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स, (OBC Indian Chamber of Commerce) इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे चेअरमन प्रा. काशीराम वंजारी हे शेतकऱ्यांसाठी आता ‘अकोले पॅटर्न’ घेऊन आले आहेत. बळीराजाला वाचवण्यासाठी रामबाण उपाय ठरणारा एक फॉर्म्युला ते उद्या बुधवारी 23 फेब्रुवारी रोजी मुंबईत जाहीर करणार आहेत. त्यासाठी दुपारी 3 वाजता ते मुंबई मराठी पत्रकार संघात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसहित मीडियाशी संवाद साधणार आहेत. गेल्या अनेक महिन्यातला शेतकरी आत्महत्येचा आकडा अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे बळीराजाला मरणाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी हा पॅटर्न आशादायी ठरणार आहे.

काळीज करपवणारा आत्महत्येचा आकडा

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेली आत्महत्या दुःखद आणि धक्कादायक असल्याने ती बातमी राष्ट्रीय होते, यावर आमचे दुमत नक्कीच नाही. पण राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक आणि कृषीप्रधान देशासाठी लांच्छनास्पद आहेत. हे आत्महत्यांचे सत्र रोखण्यासाठी ओबीसी इंडियन चेंबर झटत आहे. आमच्या या प्रयत्नांना हातभार लावून सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन त्या चेंबरतर्फे प्रा. सुरेश जांभुळकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. गेल्या दोन वर्षात तर कोरोनामुळे अनेक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. कारण सततच्या लॉकडाऊनचीही शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. आता कुठे कोरोनाचे आकडे कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे.

शेतसारा भारण्याचीही ऐपत नाही

लहरी निसर्ग आणि दलालांची मर्जी, मनमानी यांच्या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे. लागवड खर्चात वाढ, उत्पादनात घट आणि शेतीमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्याचा आणि बेभरवशाचा बनला आहे असे सांगतानाच विदर्भातील बड्या बड्या शेतकऱ्यांची शेतसारा भरण्याची सुद्धा ऐपत राहिलेली नाही, याकडे ओबीसी इंडियन चेंबरने लक्ष वेधले आहे. कधी कोरोना, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी अशा सतच्या संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. त्यातच पाचवीला पुजलेला अवकाळी अनेकदा शेतकऱ्यांची हाततोंडाला आलेली पिकं घालतो, त्यामुळे या नव्या अकोले पॅटर्नकडून शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आहे.

परदेशी तेलबिया ‘जोजोबा’ची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, जाणून घ्या सर्वकाही

निसर्गाचा लहरीपणा : महिन्याभरापूर्वी पाण्यामुळे तर आता पाण्याविना पिकांचे नुकसान, कांदा उत्पादकांवर अशी ‘ही’ वेळ

सातबारा उताऱ्यावरुन पोटखराबा नोंदी होणार गायब, क्षेत्र वहिताखाली अन् उत्पादनातही होणार वाढ

Follow Us
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस
मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु - फडणवीस.
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?
अर्थसंकल्प मांडताना फडणवीस अजित पवारांबद्दल काय म्हणाले?.
दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
दिवंगत अजित पवारांचं भव्य स्मारक उभारणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.