AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात किती महिलांवर अत्याचार? राज ठाकरेंनी कुंडलीच मांडली, म्हणाले “2023 मध्ये…”

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचारांची आकडेवारीच वाचून दाखवली आहे. या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात किती महिलांवर अत्याचार? राज ठाकरेंनी कुंडलीच मांडली, म्हणाले 2023 मध्ये...
| Updated on: Aug 24, 2024 | 1:43 PM
Share

Raj Thackeray Maharashtra Rape Case : बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात असंख्य महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचारांची आकडेवारीच वाचून दाखवली आहे. या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहे. राज ठाकरे आज अमरावती, नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 2017 पासून 2023 पर्यंत किती अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी मुंबईत विनयभंगांचे सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपुरात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग, अनैतिक व्यापार याबद्दलच्या गुन्ह्यांची नोंद अधिक आहे.

मुंबईत विनयभंगांचे सर्वाधिक गुन्हे

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती आहे. शासनाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या. त्यानंतरही महिलांवर अत्याचार होत आहे. २०२३-२०२४ च्या आकडेवारीनुसार मुंबईत विनयभंगांची सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहे. त्यानंतर पुणे, नागपुरातील गुन्हे अधिक आहेत. बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग, अनैतिक व्यापार आदी गुन्हे घडत आहेत.

राज ठाकरेंनी सांगितलेली आकडेवारी

  • २०१७ मध्ये राज्यात ४३२० बलात्कार झाले
  • २०१८ मध्ये राज्यात ४९७४ बलात्कार झाले
  • २०१९ मध्ये राज्यात ५४१२ बलात्कार झाले
  • २०२० मध्ये राज्यात ४८४६ बलात्कार झाले
  • २०२१ मध्ये राज्यात ५९५४ बलात्कार झाले
  • २०२२ मध्ये राज्यात ७०८४ बलात्कार झाले
  • २०२३ मध्ये राज्यात ७५२१ बलात्कार झाले

एवढी प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला आहे. महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. हे केवळ नोंद झालेले गुन्हे आहेत. नोंद नसलेले गुन्हे अधिक असतील. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशात खालोखाल अधिक प्रकरणे आले आहेत. राज्यात २०१९ ते २०२१ या काळात १८ वर्षीय आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची १ लाख ८४२ प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी याचिका दाखल केली होती. त्यातूनही ही आकडेवारी आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

एका केसला एवढा विलंब होत असेल, तर काय करायचं?

“बीड आणि सांगलीत ऊसतोड कामगार महिलांच्या न कळत गर्भाशये काढली जाण्याची प्रकरणे समोर आली आहे. कामात सुट्ट्या घेऊ नये म्हणून त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. या दोन जिल्ह्यात रोज एक प्रकरण येतं. रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला असे किती गुन्हे दाखल होत आहे. जे इतके दिवस दाखवले जात नव्हते ते आता दाखवले जात आहे. आता आपल्याकडे अजूनही कठोर कायदा होत नाही. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं. कोण कळलं किती बलात्कार झाला हे कळलं. त्याला फाशी १२ वर्षाने झाली. एका केसला एवढा विलंब होत असेल तर यांचं काय करायचं सांगा?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

“या सर्व गोष्टी जे बंद पुकारला होता त्यांच्याही काळात आहे. आजही आहेत. आता जे रोजच्या रोज सुरू आहे. आज इथे झाला इथे झाला त्यामागे काही निवडणुका आहेत का? त्या मागे येणाऱ्या निवडणुका आहेत का? आपल्याला विषय काय तर ही गोष्ट राज्यात होऊ नये ही महत्त्वाची आहे. निवडणुका आल्यावर सरकारला बदनाम करा. यांच्याही काळात होतंच की. लॉकडाऊन काळात त्यांचं सरकार होतं. तेव्हाही प्रकरण होतेच की”, असेही राज ठाकरे म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.