AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नव्या विस्तारात शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, अमित शाह यांच्या सूचना; संजय राऊत यांचा मोठा दावा

बजरंग बलीच्या नावाने कर्नाटकात दंगली घडवता आल्या नाहीत. महाराष्ट्रात देखील हे प्रयोग अनेक वेळा झाले ते यशस्वी झाले नाही, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.

नव्या विस्तारात शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार, अमित शाह यांच्या सूचना; संजय राऊत यांचा मोठा दावा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 09, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला आहे. भविष्यात जर मंत्रिमंडळ विस्तार होऊ झाला तर मिंधे गटाच्या चार प्रमुख मंत्र्यांना वगळण्याच्या सूचना अमित शाह यांनी परवाच्या भेटीत दिल्याची माहिती आहे. अमित शाह यांनी या मंत्र्यांना घेऊ नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. ते मीडियाशी बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुटुंबासह जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कुटुंबासह गेले असतील. तिकडे बर्फ पडत आहे. बर्फाची मजा काही वेगळीच असते. इकडे उन्हाळा आहे, डोकं शांत करायला गेले असतील. भविष्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर स्फोट होणार आहेत. अमित शाह यांनी त्यांना विस्ताराबाबत आदेश दिले आहेत. काही मंत्र्यांना वगळण्याचे हे आदेश आहेत. ते ओझं घेऊन मुख्यमंत्री कश्मीरला गेले असतील, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

दंगलीमागे राजकीय हात

कोल्हापूर येथील दंगलीवरूनही त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. गेल्या दहा वर्षात दंगली मागे राजकारण असतं आणि राजकीय हात आहे. देशातील राजकारणाला चटक लागली आहे. ज्यांना धर्मांतेचं राजकारण करायचं आहे. त्यांना चटक लागली आहे. राजकारणाचा शॉर्टकट मार्ग निवडतात. दंगली घडवतात आणि हिंदू मुसलमान किंवा अन्य धर्मात भेदाभेद करून मग निवडणुकीला सामोरे जातात. राज्यात आजही भाजप महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. मुंबई, पुणे नागपूर, ठाण्यासारखी शहरे ही महापौरांशिवाय आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून एकतर्फी राज्यकारभार सुरू आहे. लोक काय निर्णय देतील याची खात्री नाही. त्यामुळे धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे, असं राऊत म्हणाले.

उद्योग गुजरातला नेण्याचं कारस्थान

तुमचं हिंदुत्व एवढं कच्चं आहे का? तुमचं हिंदुत्व तकलादू पायावर आहे का? कुठल्या तरी मोगल राजाचे फोटो दाखवले आणि हिंदुत्व खतऱ्यात आलं. अटक करा, कारवाई करा. कठोर करावाया करा. सरकार तुमच्या हातात आहे. अशा घटना घडल्या किंवा घडवून झाल्या की राज्यातील एका विशिष्ट संघटनेला निरोप दिला जातो. या संघटनांचे लोक एकत्र येतात.

अर्ध शिक्षित मुलं असतात, त्यांची माथी भडकवली जातात. मग अशा प्रकारे उन्माद निर्माण करून राज्य अस्थिर करून खतऱ्यात खतऱ्यात म्हणून निवडणुकांना सामोरे जायचं असं घाणेरडं राजकारण सुरू आहे. म्हणून त्याचाच फायदा घेऊन इथले उद्योग बाजूच्या राज्यात न्यायचे. महाराष्ट्र अस्थिर आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नाही म्हणायचं. सर्व गुजरात राज्यात न्यायचं असं कारस्थान सुरू आहे. आमचे लोकं त्याला दुर्देवाने बळी पडत आहेत, असा दावा त्यांनी केला.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.