AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, मुंबईत श्वास घेणं कठीण, तुमच्या भागातील AQI काय?

मुंबईतील हवा प्रदूषण गेल्या ७ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. ३४४ AQI मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडत असून आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

धक्कादायक! 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, मुंबईत श्वास घेणं कठीण, तुमच्या भागातील AQI काय?
mumbai pollution
| Updated on: Feb 22, 2026 | 8:16 AM
Share

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची हवा सध्या आरोग्यासाठी अतिधोकादायक वळणावर पोहोचली आहे. गेल्या ७ वर्षांतील फेब्रुवारी महिन्याचा आढावा घेतल्यास यंदा मुंबईने प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. शुक्रवारी मुंबईचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४४ च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी परिस्थिती अनुभवावी लागत आहे.

७ वर्षांतील भीषण वास्तव

२०२० ते २०२६ या कालावधीवर नजर टाकल्यास, ७ वर्षांपूर्वी २०२० मध्ये याच फेब्रुवारी महिन्यात सरासरी AQI ९१ होता. मात्र, यंदा १०, १८ आणि १९ फेब्रुवारी हे तीन दिवस वगळता संपूर्ण महिनाभर प्रदूषणाचा आकडा १०० च्या पार राहिला आहे. त्यामुळे गेल्या ७ वर्षांत प्रथमच मुंबईने घातक हवेची पातळी ओलांडली आहे. यामुळे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई आता १५७ व्या स्थानावर पोहोचली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सकाळी दक्षिण मुंबईसह उपनगरांत धुके आणि धुरक्याचे (Smog) साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंकवर दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

विभाग AQI पातळी श्रेणी
चांदिवली २३८ खराब
मालाड पश्चिम २४० खराब
BKC (वांद्रे-कुर्ला संकुल) २३४ खराब
नवी मुंबई २६७ चिंताजनक
आरामनगर १८६ मध्यम-खराब
अंधेरी पूर्व १६१ मध्यम
कुर्ला २१२ खराब

वाढत्या वायू प्रदूषणामागे तीन कारणं कोणती?

हवामान तज्ज्ञांच्या मते, हवेतील PM-2.5 चे प्रमाण १८१ मायक्रोग्रॅम आणि PM-10 चे प्रमाण २१० मायक्रोग्रॅमवर पोहोचले आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिकांना डोकेदुखी, अस्वस्थता आणि दम्याचा त्रास जाणवत आहे. सध्या मुंबईतील AQI १५० ते ३०० च्या दरम्यान असल्याने श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींसाठी तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान मुंबईतील या वाढत्या वायू प्रदूषणामागे बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहनांचा धूर आणि बदलणारे हवामान ही प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. विशेषतः मुंबई महापालिकेने (BMC) धूळ नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली, तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. त्यामुळे सकाळी लवकर फिरणे टाळावे आणि घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा वापर करावा. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ झाल्यास आणि वाऱ्याचा वेग मंदावल्यास ही गुदमरून टाकणारी स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.