AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, मुंबईत श्वास घेणं कठीण, तुमच्या भागातील AQI काय?

मुंबईतील हवा प्रदूषण गेल्या ७ वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून फेब्रुवारी महिन्यात प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. ३४४ AQI मुळे मुंबईकरांचा श्वास कोंडत असून आरोग्य तज्ज्ञांनी मास्क वापरण्याचा आणि सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

धक्कादायक! 7 वर्षांचा रेकॉर्ड मोडला, मुंबईत श्वास घेणं कठीण, तुमच्या भागातील AQI काय?
mumbai pollution
| Updated on: Feb 22, 2026 | 8:16 AM
Share

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची हवा सध्या आरोग्यासाठी अतिधोकादायक वळणावर पोहोचली आहे. गेल्या ७ वर्षांतील फेब्रुवारी महिन्याचा आढावा घेतल्यास यंदा मुंबईने प्रदूषणाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. शुक्रवारी मुंबईचा सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३४४ च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांना अक्षरशः श्वास कोंडल्यासारखी परिस्थिती अनुभवावी लागत आहे.

७ वर्षांतील भीषण वास्तव

२०२० ते २०२६ या कालावधीवर नजर टाकल्यास, ७ वर्षांपूर्वी २०२० मध्ये याच फेब्रुवारी महिन्यात सरासरी AQI ९१ होता. मात्र, यंदा १०, १८ आणि १९ फेब्रुवारी हे तीन दिवस वगळता संपूर्ण महिनाभर प्रदूषणाचा आकडा १०० च्या पार राहिला आहे. त्यामुळे गेल्या ७ वर्षांत प्रथमच मुंबईने घातक हवेची पातळी ओलांडली आहे. यामुळे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई आता १५७ व्या स्थानावर पोहोचली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून सकाळी दक्षिण मुंबईसह उपनगरांत धुके आणि धुरक्याचे (Smog) साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी-लिंकवर दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

विभाग AQI पातळी श्रेणी
चांदिवली २३८ खराब
मालाड पश्चिम २४० खराब
BKC (वांद्रे-कुर्ला संकुल) २३४ खराब
नवी मुंबई २६७ चिंताजनक
आरामनगर १८६ मध्यम-खराब
अंधेरी पूर्व १६१ मध्यम
कुर्ला २१२ खराब

वाढत्या वायू प्रदूषणामागे तीन कारणं कोणती?

हवामान तज्ज्ञांच्या मते, हवेतील PM-2.5 चे प्रमाण १८१ मायक्रोग्रॅम आणि PM-10 चे प्रमाण २१० मायक्रोग्रॅमवर पोहोचले आहे. वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा वाढला आहे. यामुळे नागरिकांना डोकेदुखी, अस्वस्थता आणि दम्याचा त्रास जाणवत आहे. सध्या मुंबईतील AQI १५० ते ३०० च्या दरम्यान असल्याने श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींसाठी तो जीवघेणा ठरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

दरम्यान मुंबईतील या वाढत्या वायू प्रदूषणामागे बांधकामांमधून उडणारी धूळ, वाहनांचा धूर आणि बदलणारे हवामान ही प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे. विशेषतः मुंबई महापालिकेने (BMC) धूळ नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असली, तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत आहे. त्यामुळे सकाळी लवकर फिरणे टाळावे आणि घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा वापर करावा. पुढील काही दिवसांत तापमानात वाढ झाल्यास आणि वाऱ्याचा वेग मंदावल्यास ही गुदमरून टाकणारी स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल