AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नांची मायानगरी बनली धुराची नगरी, मुंबईत चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषण, अहवालातून धक्कादायक खुलासा

CREAच्या अहवालानुसार, मुंबईतील देवनार, सायन, कांदिवली आणि बीकेसीसारख्या ठिकाणी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे. PM2.5 च्या पातळीमध्ये राष्ट्रीय मानकांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. चेन्नई, कोलकाता या शहरांशी तुलना केल्यावर मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे.

स्वप्नांची मायानगरी बनली धुराची नगरी, मुंबईत चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषण, अहवालातून धक्कादायक खुलासा
mumbai air pollution
| Updated on: Jul 13, 2025 | 10:30 AM
Share

‘स्वप्नांची मायानगरी’ अशी ओळख असलेल्या मुंबईतील वातावरण दिवसेंदिवस ढासळू लागले आहे. मुंबईला कधीकाळी स्वच्छ आणि मोकळ्या हवेचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांच्या हवा प्रदूषणाच्या आकडेवारीने मोठी चिंता वाढवली आहे. ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (CREA) या नामांकित संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, मुंबई शहरातील हवेतील PM2.5 या विषारी कणांचे सरासरी प्रमाण राष्ट्रीय मानकांपेक्षा कमी आहे. मुंबईतील सायन आणि देवनार भागातील हवा चेन्नई-कोलकात्यापेक्षाही जास्त प्रदूषित असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईचे हॉटस्पॉट इतर महानगरांपेक्षाही प्रदूषित

या अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे देवनार, सायन, कांदिवली पूर्व आणि बीकेसी यांसारख्या मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये प्रदूषणाची पातळी ही प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. ही प्रदूषणाची पातळी चेन्नई, कोलकाता, पद्दुचेरी आणि विजयवाडा यांसारख्या इतर किनारपट्टीच्या शहरांपेक्षाही अधिक असल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईसारख्या किनारपट्टीवरील शहरात असे उच्च प्रदूषित क्षेत्र असणे हे धोक्याचे संकेत आहेत.

CREA अहवालाचे गंभीर निष्कर्ष

CREA ने देशातील २३९ शहरांतील हवेच्या गुणवत्तेवर आधारित हा सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मुंबईतील देवनार हे किनारपट्टीवरील सर्वात प्रदूषित ठिकाणांपैकी एक ठरले आहे. केवळ देवनारच नाही, तर मुंबईतील इतर काही भागांमध्येही PM2.5 ची पातळी ४० मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर (µg/m³) या राष्ट्रीय मर्यादेपेक्षा (National Ambient Air Quality Standards – NAAQS) अधिक आढळली आहे.

याउलट, दक्षिण भारतातील चेन्नई आणि पुद्दुचेरीतील निवासी भागांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या हवा अधिक स्वच्छ आढळून आली आहे. विजयवाडा आणि कोलकात्यामध्ये काही ठिकाणी प्रदूषण असले तरी, ते मुंबईतील देवनारसारख्या भागांइतके सातत्यपूर्ण आणि गंभीर नाही, असे अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

भारतातील हवा आरोग्यासाठी सुरक्षित नाही

CAAQMS (Continuous Ambient Air Quality Monitoring Stations) च्या आकडेवारीनुसार, पाहणी केलेल्या २३९ शहरांपैकी १२२ शहरांनी NAAQS ची मर्यादा ओलांडली आहे, हे चित्र भीतीदायक आहे. याहूनही चिंतेची बाब म्हणजे, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) निश्चित केलेला ५ µg/m³ हा अधिक कडक निकष एकाही भारतीय शहर पूर्ण करता आलेला नाही. याचाच अर्थ भारतातील बहुतांश शहरांतील हवा जागतिक मानकांनुसार आरोग्यासाठी सुरक्षित नाही, असे पाहायला मिळत आहे.

तातडीच्या उपाययोजनांची नितांत गरज

मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरातही अशा उच्च प्रदूषणाची नोंद होत असल्याने, स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, वाहनांचे वाढते उत्सर्जन, बांधकाम प्रकल्प आणि कचरा जाळणे ही प्रदूषणाची प्रमुख कारणे मानली जातात. मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये वाढलेले प्रदूषण लक्षात घेता, महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईकरांना शुद्ध हवा मिळू शकेल.

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?