AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार? आली तारीख

Vande Bharat Express : महाराष्ट्रातून ३ जूनपासून चौथी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार होती. परंतु ओडिशामधील रेल्वे अपघातानंतर रेल्वेचा हा उद्घाटन सोहळा लांब पडला. आता हा सोहळा कधी होणार? यासंदर्भात रेल्वेकडून माहिती दिली आहे.

Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुरु होणार? आली तारीख
five Vande Bharat Express lauch at one time 26 june
| Updated on: Jun 18, 2023 | 5:06 PM
Share

नवी दिल्ली, मुंबई : ओडीशामध्ये 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचा 3 जून रोजी होणारा लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कोकणातून जाणाऱ्या वंदे भारतचे उद्घाटन मडगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हि़डिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होते. मात्र, ओडिशामधील अपघातानंतर हा कार्यक्रम रद्द झाला अन् त्याच दिवशी रिकामी गाडी मुंबईला परत आली. ओडिशात येथील अपघातामुळे रेड सिग्नल मिळालेल्या या गाडीला आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस कधी धावणार त्याची घोषणा रेल्वे मंत्रालयाने केली आहे.

कधी सुरु होणार वंदे भारत

कोकणवासीय ज्या बहुचर्चित रेल्वेची प्रतिक्षा करत होते, ती आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा-मुंबई, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर आणि बेंगळुरू-हुबळी-धारवाड या पाच रेल्वे 27 जूनपासून धावणार आहे. या नवीन गाड्या सुरू झाल्यानंतर देशातील रेल्वे नेटवर्कवर धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची एकूण संख्या 23 होईल. या गाड्यांच्या समावेशामुळे या शहरांतील रहिवाशांना अधिक सोयीसुविधा उपलब्ध होतील, त्यांना आरामदायी आणि आधुनिक वाहतुकीचे साधन मिळेल.

वेळ काय असणार?

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ही ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल. जर तुम्हाला मुंबईहून गोव्याला जायचे असेल तर ही गाडी पहाटे ५.२५ वाजता सुटेल. दुपारी १.१५ वाजता गोव्याला पोहोचेल. ही गाडी गोव्याहून दुपारी २.३५ वाजता सुटून रात्री १०.२५ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली या स्थानकावरही ती थांबणार आहे.

8 डबे अन् भाडे किती

या ट्रेनमध्ये एससी चेअरकार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असे एकूण 8 डबे आहेत. जर तुम्ही चेअर कारने प्रवास करत असाल तर तुमचे भाडे 1100 ते 1600 दरम्यान असेल, तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे भाडे 2200-2800 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक

मुंबई ते गांधीनगर ट्रेन

  • मुंबई सेंट्रेलवरुन सकाळी 6:00 वाजता सुटेल आणि गांधीनगरला 12:25 वाजता पोहचणार आहे.
  • गांधीनगरवरुन दुपारी 2:05 वाजता सुटेल तर मुंबईत रात्री 8:25 ला पोहचणार आहे.
  • मुंबई ते गांधीनगर अंतर : 522 km

मुंबई ते गांधीनगर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • गांधीनगर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1420
  • Exec. Chair Car (EC) : 2630

मुंबई ते सोलापूर वंदे भारत

  • मुंबईवरुन दुपारी 4.05 वाजता सुटते तर सोलापूरला रात्री 10.40 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी संध्याकाळी 7.10 मिनिटांनी पोहचते.
  • सोलापूरवरुन सकाळी 6:05 वाजता सुटते तर मुंबईत दुपारी 12:35 वाजता पोहचते. पुण्यात ही गाडी सकाळी 9:15 वाजता येते.
  • मुंबई ते सोलापूर अंतर 455

मुंबई ते सोलापूर भाडे

  • AC Chair car (CC) : 1255
  • Exec. Chair Car (EC) : 2435
  • सोलापूर ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1150
  • Exec. Chair Car (EC) : 2185

मुंबई ते साईनगर (शिर्डी)

  • मुंबईवरुन सकाळी 6:20 वाजता सुटते, शिर्डीला 11:40 वाजता पोहचते.
  • शिर्डीवरुन संध्याकाळी 5:25 वाजता सुटते आणि मुंबईला रात्री 10:50 वाजता पोहचते.
  • मुंबई ते शिर्डी अंतर 343
  • मुंबई ते शिर्डी भाडे
  • AC Chair car (CC) : 975
  • Exec. Chair Car (EC) : 1840
  • शिर्डी ते मुंबई भाडे
  • AC Chair car (CC) : 1130
  • Exec. Chair Car (EC) : 2020

Follow Us
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.