नरेंद्र मोदींच्या ‘त्या’ विधानाचा अर्थ अजित पवारांनी सांगावा; जितेंद्र आव्हाडांचं ओपन चॅलेंज

Jitendra Awhad on PM Narendra Modi Statement About Sharad Pawar : नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील कालच्या सभेतील विविध मुद्द्यांची चर्चा होतेय. त्यांच्या भाषणातील मुद्द्यांचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणातील वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानाचा अर्थ अजित पवारांनी सांगावा; जितेंद्र आव्हाडांचं ओपन चॅलेंज
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 5:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. हे विधान कुणीही वैयक्तिक टीका म्हणून घेऊ नये, असं म्हटलं. पण पंतप्रधान एखादं विधान करतात आणि तेही निवडणूक काळात ते एखादं वक्तव्य करत असतील तर त्याचे राजकीय अर्थ काढले जाणं सहाजिक आहे. नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा सार अन् त्या विधानाच्या मागचा पुढचा भाग पाहिल्यानंतर ते विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच बाबत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना आव्हान

नरेंद्र मोदी यांनी जे म्हटलं, ते आत्मा एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर आत्म्याची गोष्ट करतो. त्यांना नेमकं काय म्हणायचं? जोपर्यंत शरद पवार मरत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्र आपल्याला मिळणार नाही? ही त्यांच्या मनातली सल आहे. हे त्यांच्या मनाला सतावतंय? शरद पवारांच्या मृत्यूवर बोलणं, ही घाणेरडी भाषा आहे. ‘भटकती आत्मा’चा अर्थ काय होतो, हे भाजपने सांगावं. विशेष म्हणजे अजित पवारांनी याच्यावर उत्तर द्यावं, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

निवडणुकीवर भाष्य

असली शिवसेनेला नकली शिवसेना भाजपचे लोक समजतात. जमिनीवरचे कार्यकर्ते उद्योग बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. केसेसला घाबरून पोरं घरी बसलेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना काही वेळ घरी बसवलं होतं. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने सगळे बाहेर पडले आहेत. कार्यकर्ते एकत्र यायला नाही, तर पांगायला सुरुवात झालेली आहे. पहाटेपासून कार्यकर्ते आलेत. ऊन वाढलंय. त्यांना विश्रांतीची आता थोडी गरज आहे. पण सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचावा म्हणून लोक एकत्र आलेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे की, शरद पवार उद्धव ठाकरे यांची लाट पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सर्व येऊन या ठिकाणी मोठमोठे सभा होतील. मशाल पेटवायची गरज नाही, मशाल पेटलेलीच आहे. लोकांच्या हक्काची ही लढाई आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Non Stop LIVE Update
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.