AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारीख ठरली, वेट अँड वॉचचा सस्पेन्स आता संपणार

मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागूनही महापौराची खुर्ची अद्याप रिकामीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २५ जानेवारीला दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतरच मुंबईच्या नव्या महापौराबाबत अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारीख ठरली, वेट अँड वॉचचा सस्पेन्स आता संपणार
bmc 1
| Updated on: Jan 18, 2026 | 1:49 PM
Share

राज्यतील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले आहे. विशेषतः देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाची अनेक दशकांची सत्ता मोडीत निघाली आहे. मात्र, आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या खुर्चीवर लागले आहे.

महापौरपदाचा फॉर्म्युला काय?

मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत भाजपला ८९ जागा मिळाल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या आहेत. भाजपला महापौर बसवण्यासाठी आणखी २५ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर शिंदे गटाकडे २९ नगरसेवक असल्याने त्यांची भूमिका निर्णायक ठरताना दिसत आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने आता मुंबईच्या महापौरपदावर दावा केला आहे. आम्हाला अडीच वर्षे महापौर पद द्या, अशी मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. शिंदे गटाने अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाचा फॉर्म्युला सुचवला आहे. मात्र अद्याप अधिकृतपणे यावर कोणतीही घोषणा झालेली नाही. सध्या शिंदे गटात या पदासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये किंवा ती टाळली जावी यासाठी शिंदे गटाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये तीन दिवस मुक्कामी ठेवले आहे. पक्षाकडून ट्रेनिंगसाठी नगरसेवकांना बोलवलं असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीमधील अंतर्गत वाटाघाटी पूर्ण होईपर्यंत हे नगरसेवक तिथेच राहण्याची शक्यता आहे.

किमान आठवडाभराची वाट पाहावी लागणार

त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक परिषदेसाठी रवाना झाले आहेत. राज्यासाठी जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, हा दौऱ्याचा उद्देश आहे. येत्या २५ जानेवारी रोजी देवेंद्र फडणवीस मुंबईत परतणार आहेत. मुंबईच्या महापौरपदाचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री दावोसहून परतल्यानंतरच घेतला जाईल, असे म्हलटे जात आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारीला मुंबई महापौर पदाचा अंतिम निर्णय होईल, असे म्हटले जात आहे. यामुळे मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी किमान आठवडाभराची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान निवडणूक निकालानंतर शनिवारी बोलावण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थितीत होते. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली. एकनाथ शिंदे यांनी आजारपणामुळे बैठकीला दांडी मारल्याचे सांगण्यात आले. मात्र ही अनुपस्थित इतर राजकीय कारणांमुळे असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.