AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्ष सोडल्यानंतर मिलिंद देवरा यांनी का दिल्या काँग्रेसला शुभेच्छा?

Why Milind Deora Wishes To Congress Party : मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पक्षांतरानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षावर भाष्य केलं आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाला शुभेच्छा का दिल्या? वाचा सविस्तर...

पक्ष सोडल्यानंतर मिलिंद देवरा यांनी का दिल्या काँग्रेसला शुभेच्छा?
| Updated on: May 21, 2024 | 6:08 PM
Share

तारीख होती 14 जानेवारी 2024… या दिवशी मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला. वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी सकाळी- सकाळी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्याच दिवशी मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर चार महिन्यांनी मिलिंद देवरा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर भाष्य केलं आहे. काँग्रेस पक्षाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यांनी या शुभेच्छा का दिल्या? तसंच लोकसभा निवडणूक अन् देवरा यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी का देण्यात आली नाही? यावरही मिलिंद देवरा यांनी भाष्य केलं.

काँग्रेसला शुभेच्छा का?

काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्यात बघायचे दक्षिण मुंबई देशातील सगळ्यात बेस्ट जीएस मतदार संघ आहे. त्यामुळे जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं की आपण ही जागा गमवायला नको. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला खूप जास्त बूली केलं. खूप जास्त दबाव टाकला आणि त्यामुळे मला बाहेर पडावं लागलं. त्यामुळे काँग्रेसला माझ्या शुभेच्छा…, असं मिलिंद देवरा म्हणाले.

कोण विजयी होणार?

दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. यावरही मिलिंद देवरा यांनी भाष्य केलं आहे. कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिलेली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवल्या त्यामुळे मी फार आनंदी आहे. यामिनीताई जाधव या फायटर आहेत. यामीन ताई नक्कीच निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी विश्वास केला आहे.

मतदान धीम्या गतीने झालं हे विरोधकांच्या षडयंत्र आहे. आपली हार झाकण्यासाठी त्या पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. दक्षिण मुंबईमध्ये यामिनी ताई निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल, असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला आहे.

गेली 45 वर्षात कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव बॅलेट पेपरवर होतं आणि मला गर्व आहे की मी फॅमिली मेंबरसाठी मतदान केलं नाही. तर मी शिवसेनेला धनुष्यबाणाला मत दिलं. मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिलं. महायुतीकडे पाच पांडव होते आणि या पाच पांडवांनी या ठिकाणी काम केलेला आहे, स्वतः एक पांडव आहे त्यातलाच… गिरणी कामगार आणि किरण गावातील लोकांचा फार जातील प्रश्न आहे. विकासाचा आणि या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, न्याय देण्यासाठी काम करायचंय, असंही मिलिंद देवरा म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.