AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

Uddhav Thackeray on Band and Nishedh Andolan : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवनसमोर महाविकास आघाडी निषेध आंदोलन करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलं. वाचा सविस्तर...

भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Aug 24, 2024 | 12:30 PM
Share

बदलापूरमधील बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटने विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्रबंदची हाक दिली होती. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. मात्र या बंदच्या विकरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर हा बंद बेकायदेशीकर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. शिवाय बंद पाळण्यात आल्यास त्यावर कायदेशीर कारवाईचे आदेशही न्यायालयाकडून म्हणण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून आज राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील शिवसेना भवनसमोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?, असा सवाल त्यांनी केलाय.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अजूनही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत. ते तुम्ही दाखवून दिलं. जे उद्दाम सरकार घटनाबाह्य सरकार राज्य करत आहे. त्या सरकारची किव येते. नराधमांवर पांघरून घालण्याचं त्यांना पाठिशी घालण्याचं काम सुरू आहे. सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो. आपण महाराष्ट्र बंद पुकारला होता. हा बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही. निर्ढावलेलं सरकार आहे. राज्यावर राज्य करत आहे. बंद कडकडीत होणार अंदाज आला तेव्हा त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले अन् कोर्टाकडून बंदला अडथळा केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयावर म्हणाले…

मी काल कोर्टाला धन्यवाद दिला. आपली केस सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्ष सुरू आहे. न्याय मिळेल याचा विश्वास आहे. पण कोर्ट त्वरेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याचं अभिनंदन करतो. कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे. महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिका कर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.