AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?; उद्धव ठाकरे यांचा सवाल

Uddhav Thackeray on Band and Nishedh Andolan : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना भवनसमोर महाविकास आघाडी निषेध आंदोलन करत आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला घेरलं. वाचा सविस्तर...

भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
उद्धव ठाकरेImage Credit source: ANI
| Updated on: Aug 24, 2024 | 12:30 PM
Share

बदलापूरमधील बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटने विरोधात महाविकास आघाडीने महाराष्ट्रबंदची हाक दिली होती. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली होती. मात्र या बंदच्या विकरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर हा बंद बेकायदेशीकर असल्याचं न्यायालयाने म्हटलं. शिवाय बंद पाळण्यात आल्यास त्यावर कायदेशीर कारवाईचे आदेशही न्यायालयाकडून म्हणण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीकडून आज राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील शिवसेना भवनसमोर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा भारत बंद झाला तेव्हा हे याचिकाकर्ते कुठे गेले होते?, असा सवाल त्यांनी केलाय.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अजूनही महाराष्ट्रात जिवंत मनं आहेत. ते तुम्ही दाखवून दिलं. जे उद्दाम सरकार घटनाबाह्य सरकार राज्य करत आहे. त्या सरकारची किव येते. नराधमांवर पांघरून घालण्याचं त्यांना पाठिशी घालण्याचं काम सुरू आहे. सरकारने खणखणीत बाजू घ्यायला पाहिजे होती. पण जेव्हा दारं बंद होतात तेव्हा जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय नसतो. आपण महाराष्ट्र बंद पुकारला होता. हा बंद कडकडीत झाला असता. याची जाणीव सरकारला झाल्यानंतर एक तर संकटाचा सामना करण्याची यांची हिंमत नाही. निर्ढावलेलं सरकार आहे. राज्यावर राज्य करत आहे. बंद कडकडीत होणार अंदाज आला तेव्हा त्यांचे चेलेचपाटे कोर्टात पाठवले अन् कोर्टाकडून बंदला अडथळा केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोर्टाच्या निर्णयावर म्हणाले…

मी काल कोर्टाला धन्यवाद दिला. आपली केस सर्वोच्च न्यायालयात अडीच वर्ष सुरू आहे. न्याय मिळेल याचा विश्वास आहे. पण कोर्ट त्वरेने हलू शकतं हे काल कोर्टाने दाखवलं याचं अभिनंदन करतो. कोर्टाने ठरवलं तर निर्णय घेऊ शकतं. बंदला बंदी केली असली तरी राज्यातील प्रत्येक हृदयात तुमच्या विरोधात मशाल धगधगत आहे. महिलांना सुरक्षा पाहिजे म्हणून बंद केला. त्यात अडथळा आणला. गेल्या आठवड्यात भारत बंद झाला. इतर राज्यात रेल्वेही बंद झाल्या होत्या. तेव्हा याचिका कर्ते कुठे गेले होते. तेव्हा बंदला विरोध केला नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.