AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : गंमतीचा भाग जाऊ द्या, पण हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडू शकणार; अजितदादांनी मित्रांसह विरोधकांना करुन दिली आठवण, कोणता आहे तो विक्रम

Ajit Pawar Record : अजितदादांना या एका रेकॉर्डचं कौतुक असलं तरी त्यात एक दुखरी बाजू पण आहे. अजितदादांचा हा रेकॉर्ड सध्या राज्यात मोडने कुणालाच शक्य नाही. गेल्या काही भाषणात दादांनी या विक्रमाची सातत्याने चर्चा केली असली तरी त्यातील एक दुसरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे.

Ajit Pawar : गंमतीचा भाग जाऊ द्या, पण हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडू शकणार; अजितदादांनी मित्रांसह विरोधकांना करुन दिली आठवण, कोणता आहे तो विक्रम
अजित पवार यांच्या विक्रमाची पुन्हा चर्चा
| Updated on: Sep 08, 2024 | 3:15 PM
Share

अजितदादा हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठीच नाही तर भूमिकेसाठी पण ओळखले जातात. बारामतीत येथे आज त्यांनी जनता दरबार भरवला. त्यांनी लोकांशी हितगुज साधले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. विकास कामे करुन सुद्धा पराभव झाल्याचे दुःख त्यांनी जाहीर केले. त्याच दरम्यान त्यांनी विरोधकांसह मित्रांना त्यांच्या एका रेकॉर्डची आठवण करून दिली. अजितदादांचा हा रेकॉर्ड मोडणे सध्याच्या स्थितीत तरी कुणालाच शक्य नाही. पण हा रेकॉर्ड सांगताना त्याची दुसरी दुखरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. कोणता आहे हा रेकॉर्ड?

पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो. इतरांच्या मुख्यमंत्री पदाचं काय मला माहीत नाही. पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची जी संधी मला मिळाली ती कुणाला मिळाली नाही. गंमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही, असे अजित पवार आज बारामतीत म्हटले. यापूर्वी पण त्यांनी या रेकॉर्डचा उल्लेख केला आहे.

दुखरी बाजू काय?

अजित पवार हे राज्याच्या राजकारणात 1991 पासून आहेत. कृषी, जलसंधारण, पाटबंधारे, ऊर्जा आणि नियोजन, जलसंपदा, अर्थ खाते अशा बड्या खात्यांचा कारभार त्यांनी लिलया हाकला आहे. त्यांच्याकडे प्रशासनाकडून काम करून घेण्याचा दांडगा अनुभव आहे. नियोजन आणि सुक्ष्म निरीक्षण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. अनेक विभागाची आणि राज्याची खडान खडा माहिती आहे. पण इतके असून ही मुख्यमंत्री पदाने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली आहे. एकवेळ तर राष्ट्रवादीच्या राज्यात अधिक जागा असताना पण काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचं आवतान दिल्याने त्यांची ही संधी पण हुकली.

या काळात होते उपमुख्यमंत्री

अजितदादा २०१० ते २०१२ या काळात उपमुख्यमंत्री पदी होते. त्यांच्याकडे वित्त, नियोजन आणि ऊर्जा खात्याचा कारभार होता. त्यानंतर २०१२ ते २०१४ या काळात उपमुख्यमंत्री पद चालून आले. पुढे २०१९ साली ते उपमुख्यमंत्री झाले. नाट्यमय घडामोडीनंतर हे सरकार टिकले नाही. त्यानंतर २०१९ ते २०२२ या काळात उपमुख्यमंत्री पदी राहिले. तर आता बंडाळीनंतर ते महायुतीत सहभागी झाले. तेव्हा त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.