AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : गंमतीचा भाग जाऊ द्या, पण हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडू शकणार; अजितदादांनी मित्रांसह विरोधकांना करुन दिली आठवण, कोणता आहे तो विक्रम

Ajit Pawar Record : अजितदादांना या एका रेकॉर्डचं कौतुक असलं तरी त्यात एक दुखरी बाजू पण आहे. अजितदादांचा हा रेकॉर्ड सध्या राज्यात मोडने कुणालाच शक्य नाही. गेल्या काही भाषणात दादांनी या विक्रमाची सातत्याने चर्चा केली असली तरी त्यातील एक दुसरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे.

Ajit Pawar : गंमतीचा भाग जाऊ द्या, पण हा रेकॉर्ड कोणीच नाही मोडू शकणार; अजितदादांनी मित्रांसह विरोधकांना करुन दिली आठवण, कोणता आहे तो विक्रम
अजित पवार यांच्या विक्रमाची पुन्हा चर्चा
| Updated on: Sep 08, 2024 | 3:15 PM
Share

अजितदादा हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठीच नाही तर भूमिकेसाठी पण ओळखले जातात. बारामतीत येथे आज त्यांनी जनता दरबार भरवला. त्यांनी लोकांशी हितगुज साधले. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. विकास कामे करुन सुद्धा पराभव झाल्याचे दुःख त्यांनी जाहीर केले. त्याच दरम्यान त्यांनी विरोधकांसह मित्रांना त्यांच्या एका रेकॉर्डची आठवण करून दिली. अजितदादांचा हा रेकॉर्ड मोडणे सध्याच्या स्थितीत तरी कुणालाच शक्य नाही. पण हा रेकॉर्ड सांगताना त्याची दुसरी दुखरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. कोणता आहे हा रेकॉर्ड?

पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो. इतरांच्या मुख्यमंत्री पदाचं काय मला माहीत नाही. पण पाच वेळा उपमुख्यमंत्री होण्याची जी संधी मला मिळाली ती कुणाला मिळाली नाही. गंमतीने सांगायचं तर ते रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही, असे अजित पवार आज बारामतीत म्हटले. यापूर्वी पण त्यांनी या रेकॉर्डचा उल्लेख केला आहे.

दुखरी बाजू काय?

अजित पवार हे राज्याच्या राजकारणात 1991 पासून आहेत. कृषी, जलसंधारण, पाटबंधारे, ऊर्जा आणि नियोजन, जलसंपदा, अर्थ खाते अशा बड्या खात्यांचा कारभार त्यांनी लिलया हाकला आहे. त्यांच्याकडे प्रशासनाकडून काम करून घेण्याचा दांडगा अनुभव आहे. नियोजन आणि सुक्ष्म निरीक्षण या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. अनेक विभागाची आणि राज्याची खडान खडा माहिती आहे. पण इतके असून ही मुख्यमंत्री पदाने त्यांना सातत्याने हुलकावणी दिली आहे. एकवेळ तर राष्ट्रवादीच्या राज्यात अधिक जागा असताना पण काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचं आवतान दिल्याने त्यांची ही संधी पण हुकली.

या काळात होते उपमुख्यमंत्री

अजितदादा २०१० ते २०१२ या काळात उपमुख्यमंत्री पदी होते. त्यांच्याकडे वित्त, नियोजन आणि ऊर्जा खात्याचा कारभार होता. त्यानंतर २०१२ ते २०१४ या काळात उपमुख्यमंत्री पद चालून आले. पुढे २०१९ साली ते उपमुख्यमंत्री झाले. नाट्यमय घडामोडीनंतर हे सरकार टिकले नाही. त्यानंतर २०१९ ते २०२२ या काळात उपमुख्यमंत्री पदी राहिले. तर आता बंडाळीनंतर ते महायुतीत सहभागी झाले. तेव्हा त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.