AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert | राज्यात पुढील पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस; ग्रामीण भागासह शहरांत मुसळधारेचा अंदाज

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

Weather Alert | राज्यात पुढील पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस; ग्रामीण भागासह शहरांत मुसळधारेचा अंदाज
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 3:06 PM
Share

मुंबई : राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. सप्टेंबर संपत असताना पाऊस संपूर्ण राज्यात धुमशान घालणार आहे. हवामान खात्याने याबाबत नवीन अपडेट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवसांत सर्वत्र गडगडाटासहीत पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Rain with thunderstorms over the next five days in the state, flood forecast in cities including rural areas)

हवामान खात्याने काय म्हटले आहे?

राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.त्याची तीव्रता येत्या 24 तासांत आणखी वाढणार आहे. तसेच हे क्षेत्र पुढील 48 तासांत ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा अंदाज वर्तवून सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने गेल्या आठवड्यात म्हटले होते की,’सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती येत्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. विदर्भात जोरदार पाऊस होईल. त्यानंतर हा पाऊस राज्याच्या उत्तरेकडील बहुतेक भागाला व्यापून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार सध्या विदर्भात पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. पावसाने नागपूरला सर्वाधिक तडाखा दिला आहे. त्यात आता पुढील चार ते पाच दिवसांत पासचा जोर आणखी वाढू शकेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचीही धास्ती वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील प्रशासन सतर्क राहिले आहे.

परतीच्या पावसाला विलंब

चालू वर्षी परतीचा पाऊस लांबणार असल्याचे हवामान खात्याने याआधीच सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. खरिपातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचवेळी पावसाने नुकसान करू नये, अशी प्रार्थना राज्यातील नागरिक करीत आहेत. यंदा कोकणसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला होता. त्यामुळे पावसाच्या जोरदार हजेरीमुळे धडकी भरत आहे. गेल्या आठवड्यात मुंबई आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाची हजेरी लागली होती. त्यामुळेही शहरी भागांत ठिकठिकाणी पाणी साचले होते. (Rain with thunderstorms over the next five days in the state, flood forecast in cities including rural areas)

इतर बातम्या

‘त्या’ नराधमांना फाशी देऊ नका, त्यांचा लिंगच्छेद करून गावागावातून मिरवणूक काढा; रिपाइं महिला कार्यकर्त्या संतापल्या

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा, जयंत पाटलांचे आदेश

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.